अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. यात आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे लोकशाही वर घाव घातला जात आहे. यामुळे आर्वी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी निषेध नोंदवला.
मणिपूर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे. असे यावेळी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी आपली भावना व्यक्त केली.
दोषींना कडक शिक्षा करा…
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात समता सैनिक दल आर्वी व आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी मणिपूर राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी, तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी आज दिनांक 24 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी आर्वी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना, विनोद कांबळे, अनिकेत सरोदे,अर्पीत वाहणे,सम्यक दिलीपराव माहोरे, मधुकरराव सोमकुवर, लखन दाबणे, चेतन दाहीर हे उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

