अर्पित वाहाने आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- काही वर्षांपूर्वी आर्वी शहरातील बस आगार वर्धा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर होते, मात्र प्रथम क्रमांकावर असणारे आगार देखभाल दुरुस्ती व भंगार बसेस मुळे चर्चेत आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे, आगार व्यवस्थापकाचे देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष होय, दुर्लक्ष होत असल्याने बसेस कुठेही बंद पडतात याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हेच नव्हे तर प्रवाशांना मानसिक शारीरिक वेदणा होत असल्याची ओरड सुरू आहे.
असाच एक प्रकार काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी आर्वी बस्थानक येथुन सायंकाळी 5.30 वाजता MH 40- Y 5367 या क्रमांकाची बस शालेय विद्यार्थी व काही प्रवाशी घेऊन आर्वी ते हिवरा, मार्ग चिंचोली डांगे हराशी पाचोडला रवाना झाली असता परंतु बसमध्ये असलेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे हि महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाची बस. पाचोड व हराशी घाटावर चढ चढू शकली नाही आणि बस चालक व वाहक यांना हि बस चढावरून वर काढण्याकरिता तब्बल एक तास आपला वेळ वाया घालवावा लागला, बसमधिल प्रवाशांना खुप मोठा त्रास सहन करावा लागला, प्रवाशी तर सोडाच आर्वी बस्थानकातील कर्मचारी चालक व वाहक सुद्धा या भंगार बसेस मुळे, त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
याच संदर्भात अनेक प्रवाशांनी आर्वी आगार व्यवस्थापक, (DM) इंगोले यांच्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यातल्या त्यात आगार व्यवस्थापकाच्या हल्लगर्जी पणा मुळे प्रवाशांच्या मनस्थापकाचे कारण ठरत आहे आगार व्यवस्थापकाने बसेस फेरी करून आल्यावर बसेसचा मेंटेनन्स अर्थातच देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे परंतु असं होतं असल्याचे दिसत नाही असे झाले असते तर बसेस लहान लहान कारणां मुळे बिघडल्या नसत्या तरी या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रवाशांची मागणी आहे. हि मागणी पुर्ण न झाल्यास युवक काँग्रेस कमेटी तथा माजी आमदार श्री अमरभाऊ काळे मित्र परीवार आर्वी तर्फे आक्रमक भूमिका घेन्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

