अक्षय म्हात्रे, पेण प्रतिनिधी: 7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज : ऑनलाईन पेण:- गेल्या 13 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.मात्र शासन महामार्गाकडे पडलेल्या खड्यांकडे लक्ष देत नाही. तसेच खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचा कांगावा राज्य सरकारने केला आहे.आता आपणच रस्त्यावर उतरून शासनाकडे खड्डे भरायला पैसे नसल्याने भीक दो आंदोलन करून ते पैसे शासनाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे असे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी सांगितले. या आंदोलनात पत्रकार तसेच सोबती संस्था सुद्धा सामील होणार आहेत. रविवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशी नाका, पेण येथे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे भीक द्या आंदोलन रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशीनाका येथे केले जाणार आहेत. तर भिकेच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम एकत्र करून ती प्रशासनाच्या ताब्यात देऊन शासनाकडे पाठवण्याची विनंती करणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

