परिसरातील शांतता भंग करून सामान्य नागरीकांना धाक दाखविण्याचा प्रयत्न.
प्रशांत जगताप
हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात क्राईम ग्राफ वाढत असल्याचे दिसून येत आहे. गांजा अवैध दारू तस्करी याचा महापूर आल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यात आता गुंडागर्दी पण मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरात पोलिस प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
28 ऑगस्ट रविवारला रात्री १०.०० ते १०.३० वाजताच्या सुमारास प्रबुद्ध नगर येथील सम्मक बुद्ध विहाराच्या प्रांगणात काही गांव गुंड मुलांनी मारपीट करत धुमाकुळ घालत परिसरातील शांतता भंग करून सामान्य नागरीकांना धाक दाखविण्याचा प्रयत्न केला.
प्राप्त माहीतीनुसार, प्रबुद्ध नगरात असलेले बोद्ध धर्मियांचे बुद्ध विहार आहे. रात्रीच्या सुमारास विहाराच्या प्रांगणात काही गुंड प्रवृत्तीची मुल आप आपसात मारपीठ आणि शिवीगाळ करीत होते. त्यांच्या जवळ धारदार शस्त्र होते, वार्डातील काही जेष्ठ नागरीक व महिला फिरत असता त्यांना या मुलांना हटकले असता त्यानांच या मुलांनी शस्त्रांचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर परीसरातील जास्त प्रमाणात लोक जमा होताच त्यांनी तिथुन पळ काढला व त्यांच्या जवळ असलेले शस्त्र बुद्ध विहाराच्या प्रांगणातच फेकुन दिले. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून हिंगणघाट पोलिस स्टेशनला देण्यात आली.
या अगोदरही बुद्ध विहाराच्या प्रांगणात बाहेर वार्डातील मुले असेच विनाकारण येवुन नशीले पदार्थाचे सेवन करतात व वार्डातील नागरीकांना धमकवितात. विहाराच्या रोड मागे ट्रॅक, ट्रॅवल्स उभे असतात त्यामुळे या मुलांना लपायला जागा मिळते तसेच ही मुले अंधाराचा फायदा घेवुन दारू, गांजा पिणे, आमली पदार्थाचे सेवन करतात व भिंत ओलांडुन विहाराच्या आत प्रवेश करतात. यांचा त्रास सर्व सामान्य नागरीकांना सतत होत आहे. अशाप्रकारामुळे मागच्या वर्षी विहारात चोरी सुध्दा झाली. 15 दिवसाआधी प्रांगणातुन लोखंडी ड्रम व सलाखी चोरी गेल्या.
या अशा प्रकारामुळे वार्डातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रकरणातील आरोपीपैकी एक मुलाच्या आईने वार्डातील बिना पाटील यांच्याकडे जावुन माझ्या मुलाची तक्रार का केलीस म्हणुन वाद केला, विहाराच्या ३०० मीटरच्या आत अशे प्रकार व्हायला नको व कालच्या प्रकरणात जे आरोपी असेल त्यावर कठोर गुन्हे नोंदवुन या प्रकरणावर कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदन स्थानिक हिंगणघाट पोलिस स्टेशनला समस्त प्रबुध्द नगरवासीयांतर्फे देण्यात आले.
यापुढे जेणेकरून विहारातील प्रांगणात किंवा आजुबाजुला असे प्रकार होणार नाहीत व ट्रक, ट्रॅव्हल्स मालकांना सुचित करून विहाराच्या मागील बाजुस वाहणे न ठेवण्यास कळवावे याबाबत आपल्या स्तरावर तिथे वाहणे उभे करू नये / ठेवु नये अशी सुचना द्यावी व विहाराच्या मागे नुतन शाळेचे प्रांगण आहे तिथे रोज रात्री आमली पदार्थांचे सेवन करीत असतात. त्यामुळे आजुबाजुच्या नागरीकांना त्याचा नाहक त्रास होतो व तेथे आमली पदार्थाच्या सेवनामुळे एखादी मोठा समोर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. असे या निवेदनाव्दारे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळेस बुद्ध विहारचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रलय तेलंग, आम्रपाली भालशंकर, अमित झांबरे, कांता मानकर, मनीषा खेडकर, मनीष जवादे, केशव उमरे, रेखा इंदुरकर, मनोहर शेंदरे, दयाराम वनकर, अन्नपूर्णा बंसोड, सुनीता मून, बबन गावंडे, सेवकदास खेडकर, सुवर्णचंदा दारुंदे हे उपस्थित होते.