हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक दुःखद घटना समोर आली आहे. त्यामुळे जिल्हातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. ज्यांनी हजारो रुग्णांची सेवा शुश्रूषा करून त्यांना लवकर बरे करण्याची मुख्य भूमिका बजावली अशा सीमा मेश्राम वय 29 वर्ष परिचारिकेचा उपचारा अभावी मृत्यू झाला. परिचारिकेचा चक्क उपचारा अभावी मृत्यू होती हे आरोग्य व्यवस्थेसाठी नक्कीच कलंकित इतिहास असणारा आहे. पण चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशीच एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
हजारो रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या सीमा मेश्राम सारख्या परिचारिकांनाच वेळेवर उपचार मिळत नसेल तर इतरांचे काय हाल होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा निषेध करत परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन केले.
मृतक सीमा मेश्राम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका होत्या. 16 ऑगस्ट रोजी प्रसूती वॉर्डामध्ये रात्रपाळीत त्या कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान, त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्यावेळी तेथे एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतही सीमाला उपचारच मिळाला नाही. प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरांकडे नेले. नंतर शुक्रवारी तातडीने नागपूरला नेले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले.
मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष नाही, त्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. अशा स्थितीत सर्व सामान्य सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहेत याची दखल घेऊन योग्य पाऊले उचलली गेली तरच जिल्हात आरोग्य सेवा सुळळीत होईल. सीमा मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र संदेश न्युजच्या माध्यमातून नागरिकांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

