युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- स्वतः उपवाशी राहून खडतळ हालअपेष्टा सहन करून आपल्या पोटच्या मुलाला वाढविले. त्याला स्वतःच्या पायावर उभे केले. तोच मुलगा म्हातारपणी आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देतो असे असेल तर नराधम मुलगा नको असलेला बरा. अशीच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका आई वडिलांनी आपली कैफियत पोलिसानं समोर मांडली.
मोठ्या आम्ही मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन आमच्या मुलाला वाढवील मात्र तोच आज मुलगा आयुष्याच्या म्हातारपणी आमची काळजी घ्यायला तयार नाही. आजारपणात आमचा सांभाळ करायला तयार नाही. आम्हाला घरातून काढून टाकण्याची धमकी देतो, अशी तक्रारच एका वडिलांनी आपल्या मुलासह सुनेविरोधात पोलिसांकडे दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून मुलासह त्याचा पत्नीविरोधात ज्येष्ठ नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागपुर शहरातील गिट्टीखदान परिसरातील हजारी पहाड येथील आशा बालवाडी जवळ मजूर दाम्पत्य राहतात. त्यांचा मुलगा हा सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. वाढत्या वयामुळे काम होत नसल्याने आपल्या जबाबदारीतून मुक्त होत पित्याने काम सोडले. त्यामुळे वृद्ध पती आणि त्यांची पत्नी दोघेही घरी असतात.
यादरम्यान कधी ते आणि त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यास त्यांना औषधीसाठी मुलगा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे, त्यांना वेळेवर जेवण न देणे, कधी त्यांच्यासाठी काहीही न करणे, दुर्लक्ष करणे अशी वागणूक मुलगा आणि सून देऊ लागले.
अनेकदा ही बाब मुलाला सांगितल्यास तोही पत्नीची बाजू घेत, त्यांच्याशी भांडायचा. प्रसंगी मारहाणही करायचा. स्वतःचे घर असताना, परक्यासारखी वागणूक देत, आई-वडिलांना घरातून काढून टाकण्याची धमकी द्यायचा.
त्यामुळे त्रस्त पित्याने गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठले. त्यांची हकीकत ऐकूण पोलिसही गहिवरले. यानंतर लक्ष्मण खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी 23 कलम 24 ज्येष्ठ नागरिक कायदा सन 2007 सुधारित 2015 नुसार मुलगा आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

