उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोलखेड येथील एका विवाहितेने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अकोलखेड येथे सासरच्या मंडळींच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका 23 वर्षीय विवाहितेने दुर्दैवी पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती अकोट फैल पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आणि पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार अकोलखेड येथील लता धनराज शेवाळे वय 45 वर्ष यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या 23 वर्षीय दिव्या नामक मुलीचे 2020 मध्ये पवन गणेश चैरागडे वय 35 वर्ष यांच्यासोबत रीतिरिवाजाने लग्न लाऊन देण्यात आले. त्यांना 16 महिन्यांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर त्यांची मुलगी पतीसोबत आसामला गेली.
तेथून परत आल्यावर सासू उषा चैरागडे, नणंद अनुराधा पवन कावरे वय 32, रा. अचलपूर) वैष्णवी उर्फ टिना वर्मा वय 27, रा. अकोट ह.मु. अकोलखेड हे टोमणे मारून शिवीगाळ करत होते. अनेकदा दिव्याने पतीला सांगितले. त्याने दुर्लक्ष केले. सासू, सासरे व नणंद यांचा त्रास वाढल्याने दिव्या चैरागडे हिने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप दिव्याची आई उषा शेवाळे यांनी तक्रारीतून केला. तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

