मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. १० सप्टेंबर:- रोज रविवारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने विश्रामगृह हिंगणघाट येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार “होऊ द्या चर्चा” या विषयावर आढावा बैठकीचे आयोजन वर्धा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ तथा नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर तसेच हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत आर्वी- पुलगावचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे वर्धा, देवळी- पुलगाव व आर्वीचे विधानसभा संपर्कप्रमुख देवरुखकर, भोसले, आयवाडे तसेच हिंगणघाट नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष चंदूभाऊ घुसे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ. संगीता कडू, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अभिनंदन मनोत, व्यासपीठावर मनीष देवडे, श्रीधर कोटकर, मनोज मिसाळ, गजानन काटोले, शहर संघटक उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने यांनी केले. आढावा बैठकीची सुरुवात निलेश धुमाळ यांचे स्वागत महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत हिंगणघाट ग्रामीण व शहर पदाधिकारी तर्फे करण्यात आले. तसेच रुपेश कांबळे यांचे स्वागत हिंगणघाट येथील सर्व विभाग प्रमुख व उपशहरप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. इतर सर्व मान्यवरांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर आढावा बैठकीत प्रस्ताविक पर मार्गदर्शन सतीश धोबे, तालुकाप्रमुख यांनी केले. नंतर या आढावा बैठकीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. नंतर उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे व नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर यांनी सुद्धा या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच या आढावा बैठकीचे प्रमुख वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांनी सर्व शिवसैनिकांना आपल्या शहरातील, तालुक्यातील, गावातील, वार्डातील लोकांशी संवाद साधून केंद्र सरकार आणि मिंधे सरकारचे चुकीचे धोरणावर खुलासा करावा, तसेच केंद्र सरकार ने पेट्रोल, गॅस, डिझेल, घरगुती तेल, अनाज, शेतकऱ्यांचे खत ह्या सर्वांवर किंमती वाढ करून जनतेकडून पैश्याची लूट या दहा वर्षांत केली. त्याच प्रमाणे मिंधे सरकारने “शासन आपल्या दारी”च्या योजनेचा नावाखाली जनतेचे किती नुकसान व फसवणूक केली या बाबत गल्ली, मोहलला, नुकड, चौक या ठिकाणी जाऊन जनतेशी सु-सवांद केला पाहिजे. या केन्द्र सरकार आणि मिंधे सरकार ने सर्व सामान्य परिवाराचे आर्थिक बजेट कोलमडून टाकले यात महिला वर्गातील कुटुंबाची अडचण त्या माहुलीलाच माहीत. असे संपर्क प्रमुखाने सांगितले. या सर्व गोष्टी बाबत जनतेत जागृती व्हावी त्या साठी आराखडा तयार करून घ्या यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या बैठकीला पक्षाचे शंकर मोहम्मारे, भास्कर ठवरे, जेष्ठ शिवसैनिक सुनील आष्टीकर, सौ. सिमा गलांडे शहर संघटिका, सौ. माधुरी खडसे तालुका संघटिका, सौ. निता धोबे, सौ. प्राची पाचखेडे, सौ.नीलिमा मोहमारे, संजय पिंपळकर, लक्ष्मण बकाने, रामराव रहाटे, अनंता गलांडे, बंटी वाघमारे, मोहन तुमराम, नितीन वैद्य, नरेंद्र गुळकरी, दिलीप चौधरी,गौरव गाडेकर,अनिल दुर्गे, मोहन पडवे, संतोष चौधरी, गोवर्धन शाहू, हिरामण आवारी, रुपेश काटकर, दुर्योधन कोल्हे, अविनाश धोटे, दिलीप वैद्य, विनोद दारुंडे, नथु कुकडे, डॉम आनंद जगताब, मंगेश भोयर, आशिष जैस्वाल, गिरीधर भानखेडे, गजानन ठाकरे, विनोद मोहाड, विनोद शिवणकर, बलराज डेकाटे, दिनेश धोबे आधी शिवसैनिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

