देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील जय मंगलमूर्ती कॉलनी अमरनगर व बोदिले ले-आउट शांताई सभागृह परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता खूप पायपीट करावी लागत आहे व परिसरात असलेल्या विहिरींच्या पाण्याचे टीडीएस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता लांबवरुन पायपीट करत जलशुद्धीकरण यंत्रातून पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांनाकडे पाणी आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन नाहीत अशा नागरिकांना येथील क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे.
या नागरिकांच्या मागणीला अनुसरून भाजपा युवा मोर्चाचे कमलेश खोब्रागडे यांनी जय मंगलमूर्ती कॉलनी अमरनगर प्रभाग क्रमांक एक येथील ओपन स्पेस मध्ये जलशुद्धीकरण यंत्र लावून देण्याबाबतच्या आशयाचे निवेदन वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी असे आदेश संबंधित विभागाला दिले. यावेळी शिष्टमंडळात भाजपा युवा मोर्चाचे कमलेश खोब्रागडे, मंगेश धुर्वे, गौरव मिश्रा, राहुल भसीन व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

