प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने महात्मा फुले वार्ड मधील सुमेध बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष अशोकराव भारशंकर.यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील १५ वे पुष्प रविवार दिनांक १७ सप्टेंबर ला आयु. सुरेखताई मेश्राम यांनी सूर्यपुत्र भैय्या साहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व (स्मृति दिवस) या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बुद्धमजी कांबळे यांनी केले तर संचालन आयु. वासंतीताई देवगडे तर आभार सुरेखाताई. भिमटे यांनी केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व नगर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी संजय वानखेडे, अंबादास गायकवाड, रिंगणे सर, अभिमन्यू धोटे, राजू फुलझेले, बाळा भाले, सेवकदास झांबरे, न.त भीमटे सर, रमेश बुरबुरे, अनिल गायकवाड, धर्मदास थूल सर, चंद्रकला गेडाम, संगमित्रा मेश्राम, सुशीला जगताप, मीरा काळे तसेच सदस्य आणि वार्डातील शेकडो महिला त्याचप्रकारे उपासक – उपासिका माया कापसे, संगीता ढवळे, नागुबाई अंबादे, छाया खोबरागडे, उज्वला खोब्रागडे, शोभा काळे, माया खोब्रागडे, शकुंतला खोब्रागडे, शांताबाई , विद्या आवळे, सुरेखा भिमटे, रेखा मुंजमकार ई.आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप झाला.

