रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये मराठवाड्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
मराठवाड्याचा अमृत महोत्सव प्रसंगी सूर्यप्रकाश बुरांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके, संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके, सौ. बुरांडे, बाळू सांगुळे, रवींद्र सोळंके, ॲक्सिस बँकेचे मॅनेजर बालाजी चव्हाण तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठवाडा गीत व देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच कार्यक्रमांमध्ये लेझीम पथकाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीमवर नृत्य करून वेगवेगळ्या आकारांमध्ये आपली कला सादर केली. या कार्यक्रमांमध्ये मानवी मनोऱ्यांनी पालकांची व उपस्थित असणाऱ्या सर्वांची मने जिंकली.
यावेळी सौ बुरांडे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर खूप खूप कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठवाड्याचे स्वातंत्र्य किती मोलाचे आहे व यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा स्वातंत्र्याचे मोल हे सर्वांना कळावे त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता. इथे निजामशाही कशी आली. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या काळी हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजामशाहीच्या जोखडातून कसा मुक्त झाला याविषयीची सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर, शिक्षक वृंदामध्ये पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिलारे, पोर्णिमा गायकवाड, साक्षी झरेकर, सुरज पहाडे, निकिता खालापुरे, अरुण चंदने, शितल मुंडे, बळीराम पवार, महानंदा व्यवहारे, साधना पाईकराव, इतर कर्मचारी वर्गामध्ये शुभम चव्हाण व सुमन ढब्बे यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

