पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शुक्रवारला नागपुर शहरात मध्यरात्री पावसाने जोरदार पाऊसाने हजरी लावली त्यावबरोबर अनेक संकटे घेऊन हा पाऊस आला. दोन दिवस नागपुरात जनजीवन विस्कळित झाले. त्यात अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले.
शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुगी सारख्या पाऊसाने नागपूरला अक्षरशः झोडपल आहे. आतापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असताना, त्यात रविवारी ता.24 आणखी एका मृताची भर पडली. कृष्णकुमार लेखराम बरखंडी वय 21 वर्ष, रा. राणीडोंगरी, जमबाडा, बुदरूक, बैतुल, मध्यप्रदेश यांचा धंतोली परिसरात असलेल्या गणेशसागर रेस्टॉरेट येथे भरलेले पाणी इलेक्ट्रिक पंपाने काढत असताना, विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला.
मध्यरात्री नागपूर शहरासह जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. सीताबर्डी तर संपूर्ण पाण्याखाली डूबली होती. सीताबर्डी व धंतोली परिसरात असलेल्या अनेक मॉल व रेस्टॉरेन्टमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ते काढण्यासाठी इलेक्ट्रिक पंप लाऊन पाऊसाचे पाणी काढावे लागले.
धंतोली परिसरात असलेल्या गणेश सागर रेस्टॉरेन्टमध्येही पावसाचे पाणी शिरले. ते काढण्यासाठी नोकराने इलेक्ट्रिक पंप लावला. मात्र, त्याला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी समीर ताज मोहम्मद अंसारी वय 35 वर्ष, रा. वांजरा ले-आउट याने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
पावसाच्या तडाख्यात शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पश्चिम नागपुरातील अहबाब कॉलनीमधील मिरा पिल्लई वय 70 वर्ष, तेलंगखेडीमध्ये संध्या ढोरे आणि अजनी परिसरात पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्याने जखमी होत, संजय शंकरराव गाडेगावकर वय 52 वर्ष, रा. अयोध्यानगर, साई मंदिर मागे यांचा मृत्यू झाला. याशिवाय एका इसमाचा धंतोलीतील स्टार बस स्थानकाजवळ पाण्यात बुड्यालाने मृत्यू झाला.

