लेखक: सतिश रघाताटे, हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आमदार म्हणजे सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विधिमंडळात जनतेचा आवाज उचलणारा एक जनतेचा प्रतिनिधी. जो व्यक्ती संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा पालक असतो आणि हाच पालक, लोकप्रतिनिधी स्वताच्या स्वार्थासाठी कसा जनते सोबत खोटं बोलतो, याच मूर्तीमंत उदाहरणं म्हणजे हिंगणघाटचे (स्वयम घोषित) कार्यसम्राट आमदार समिर कुणावार.
वर्ष २०१६ हिंगणघाट नगर पालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या गोकुळधाम मैदानावर भारतीय जनता पक्षाची जाहिर सभा होती, तेव्हाचे राज्याचे अर्थ मंत्री सुधिर मुनगंटीवार मंचावर उपस्थित होते त्या सभेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावर यांनी जनतेला संबोधन करतांना त्यात ते असे म्हणले की हिंगणघाट नगर पालिकेत वना नदीवर बांधण्यात आलेला बंधारा यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि तो भ्रष्टाचार तत्कालीन नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांनी केला जर आम्ही नगर पालिकेत सत्तेत आलो तर सहा महिन्याच्या आत भ्रष्टाचार करणाऱ्यंविरोधात तक्रार दाखल करून त्यानं जेलात पाठवू. जनतेने भाजप ला भरघोस मतांनी निवडून दिले पणं आज सात वर्ष झाले ना तक्रार दाखल झाली ना कुणी जेलात गेलं. ज्याच्यावर आरोप केले त्याच सुधिर कोठारी यांच्यासोबत समिर कुणावार यांनी युती केली.
२०१९ चे विधानसभा निवडणुकीत सुधीर कोठारी यांनी समिर कुणावार यांना मदत केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत समिर कुणावार आणि सुधिर कोठारी यांनी युती केली.
आता काल परवाची गोष्ट राम मंदिर वॉर्ड तेथे भूमिपूजन कार्यक्रम करत असताना समिर कुणावार असं म्हणाले की तो बंधारा पुरामुळे वाहून गेला. स्वयम् घोषित कार्यसम्राट आमदार साहेब आता तुम्हीच सांगा 2016 साली आपण बोलले की बंधारा बांधकामात भ्रष्टाचार झाला आणि लेखा समितीचा तसा अहवाल आहे. त्यात स्पष्ट पने सांगीतल आहे की भ्रष्टाचार झाला आहे. दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाहीची शिफारस त्या अहवालात केली गेलीं आहे, मग आपण गेले सात वर्षे का तक्रार दाखल करु शकले नाही. तूमचे हात कोणी बांधले होते की स्वताच्या वयक्तिक स्वार्थासाठी झालेला भ्रष्टाचार दाबण्याचा काम तूम्ही केल. ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्यांच्याशी एवढ धडधडीत खोटे बोलताना आपल्याला काहीच कस वाटलं नाही. आमदार साहेब जनते समोर खोटं बोलतात कधी म्हणतात बंधरा भ्रष्टाचार झाला आज म्हणतात बांधरा वाहून गेला. स्वतःच्या वयक्तिक स्वार्थासाठी लोकप्रतिनिधी एवढ्या खालच्या पातळीवर कसें काय जाऊ शकतात ?
अमृत योजने अंतर्गत हिंगणघाट शहरात नवीन पाण्याच्या टाक्या उभ्या झाल्या नवीन नळ कनेक्शन लावले संत ज्ञानेश्र्वर वॉर्ड जर सोडला तर पूर्ण हिंगणघाटमधे या नळ कनेक्शन चा काहिच उपयोग नाही. पाण्याच्या टाक्या बनवल्या तश्याच आहे. कारणं बांधारा नाही. नवीन नळ पाईप लाईन टाकत असताना वॉर्डातील नवीन बनवलेले सिमेंट रोड फोडल्या गेले आज दोन तीन वर्ष उलटून गेले तरीही ते रोड अजूनही तसेच फोडलेल्या अवस्थेत आहे. नवीन पाईप लाईन टाकत असताना फोडण्यात आलेल्या रोड च्या दूरस्तीसाठी पणं निधी होता रोडची साधी दूरस्ती झाली नाही तर हा निधी गेला कुठे ?
आमदार कुनावार साहेब यांना एकच प्रश्न बांधाऱ्याच नेमक झाल काय? तूम्ही आज पर्यंत आठ वर्षांत का नाही तक्रार दाखल करु शकले. आणि आता म्हणता बंधारा वाहुन गेला आपणं शहरात वार्ड वार्डात एखादी युद्ध जिंकल्या सारखे बँड …बाजा… बराती… सहित भूमिपूजन करत आहात आपणं आणलेला नेमका निधी किती. यावर सविस्तर शब्द प्रपंच पुढचा पोष्ट मधे नक्कीच करु..
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

