Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाटकरानो शांत बसा, कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाटकरानो शांत बसा, कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक: सतिश रघाताटे, रा. हिंगणघाट मोबाईल न. 8788059150

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ऐका पहा वाचा अनुभव घ्या आणि शांत बसा. कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. आणि आम्ही जनता हे मुकाट्यानं सहन करतो आहे कारण प्रतिकार करण्याची आमची शक्ती क्षीण झाली आहे. लोकशाहीत जनता हे सर्वोच्य आहे पणं आम्ही या देशाचे राज्याचे मालक आहोत हेच मुळात आम्ही विसरलो आहोत.

मागील अकरा दिवसात भूमिपूजनाची ट्रिपल सेंच्युरी ऐकायला किती छान वाटते कान अगदी तृप्त होतात विकासच विकास सगळीकडे असे वाटायला लागते. पणं सत्य आणि भ्रम यात खूप अंतर आहे एखाद्या विषयाच्या खोलात आपणं जातो तेंव्हा भ्रमाचा भोपळा फुटलेला असतो. गेल्या काही दिवसात आपल्या हिंगणघाट शहरात भूमिपूजनाचा सपाटा सुरू आहे. रेकॉर्ड ब्रेक अकरा दिवसात तीनशे भूमिपूजन ३०० नवीन रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनणार आपल्या गावात एवढा विकास होणारं म्हंटल्यावर कोणालाही आनंदच होइल आणि झाला पाहिजे पण नेमके वास्तव काय?

५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन हिंगणघाट शहरात झाले जवळपास ३०० भूमिपूजन झाले. असे आपले आमदार साहेब स्वतःच सांगतात आणि सर्वांनी पाहिले पणं. ज्या वॉर्डांत भूमिपूजन झाले त्या वॉर्डांत सर्वप्रथम एक बँड यायचा बसायला खुर्च्या, पाच पन्नास लोकांचा नाष्टा चहा ची व्यवस्था म्हणजे जवळपास एका भूमिपूजनाचा खर्च 10 हजार रुपयांच्या घरात. भूमिपूजन झाले 300 × 10000 =3000000 म्हणजे निव्वळ भूमिपूजनाचा खर्च 30 लक्ष त्याशिवाय निमंत्रण कार्ड रूपी माहिती पुस्तिका या एका पुस्तिकेचे किँमत जवळपास 100 रूपये जवळपास 20000 पुस्तक रूपी निमंत्रण पत्रिका या छापल्या असाव्या म्हणजेच 200 × 10000 एकूणच काय तर 50 कोटी चे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे प्रसिद्धी करीता 50 लक्ष रूपये खर्च झाला असावा असे प्रथम दर्शनी तरी वाटते म्हणजेच एकूण रकमेच्या दहा टक्के खर्च फक्तं प्रसिध्दी वर याला आपण कोणता विकास समजायचं?

आमदार साहेब म्हणतात या आधी असे काही करायची कुणी हिम्मत केली नाही. बरोबरच आहे? त्यांचे हे अस काही करायची या आधीच्या कुठल्याच आमदारांची हिम्मत झाली नाही. भूमिपूजन झाले रस्त्यांच्या कामाचा दर्जा काय असेल. या आधी जे रस्ते झाले त्याची गिठी बाहेर निघाली रस्ते एकदम सीसीटीव्ही कॅमेरे लागले सहा महिन्यात बंद पडले, खालच्या स्तरातील बनवले गेले. नवीन रस्ते बांधले गेले आणि तेच रस्ते अमृत योजनेच्या नावाखाली फोडल्या गेले अमृत योजनेच्या माध्यमातून जे काम झाले ते अतिशय निच दर्जाचे. विकासाच्या नावावर फक्तं आणि फक्त काही ठराविक कार्यकर्ता पोसण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे या सर्व प्रकारात जनतेचा काय फायदा झाला तर काहीच नाही. स्वयंघोषित कार्य सम्राट आमदार समिर कुणावार साहेब आपला विकास हा वांझोटा आहे. या आधीच्या आमदारांनी काय केलं काय नाही केलं यावर सविस्तर आणि वेगळी चर्चा होऊ शकते. पणं गेल्या नव वर्षापासून तूम्ही आमदार आहात मोठ मोठाले आकडे फुगवून सांगीतले म्हणजे विकास होत नाही आपणं दिलेले आकडे फसवे आणि पूर्ण पने फसवे आहे. हे मी अत्यंत जाणिवपूर्वक सांगतो गेल्या नव वर्षांत फक्तं ठेकेदार जगवण्याच काम सुरू आहे आपणं केलेल्या तथाकथीत विकासाचा कुठलही फायदा जनतेला झाला नाही.

हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही लावले त्यात ८५ लक्ष रुपयांचा चुराडा झाला, अमृतं योजनेत करोडो खर्च झाला पण त्या योजनेचा जनतेला अजूनही काहिच फायदा नाही. अंतर्गत मल निस्सराय योजनेचे बारा वाजले, बंधारा भ्रष्टाचार अजुन तसाच आहे. पाण्याच्या टाक्या कोरड्या ठाक पडल्या आहे, तहसील कार्यालय चौक ते सरकारी दवाखाना चौक या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही एक वर्षापासून या रस्त्याचया बाबतीत पोरखेळ सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात ४०० बेड चे श्रेनिवर्धन केले म्हणून आमदार साहेबांनी श्रेय घेतले पण अजून कशाचा कशाला पत्ता नाही, उलट घाणीचे साम्राज्य दवाखाण्यात पसरले असल्याची बातमी वृत्त वाहिनीवर आले.

आज शहरातील विकासाच्या नावावर गावाचा सत्यानाश झाला तीन वर्ष आधी झालेल्या सिमेंट रोड ची परिस्थिती काय आहे. तहसील कार्यालय ते डॉ आंबेडकर चौक या रस्त्याची परिस्थिती आज काय आहे, वणां नदीवर बांधण्यात आलेला बांधारा भ्रष्टाचाराची भेट चढला आणि तो भ्रष्टाचार दाबण्याचा कार्यक्रम स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार समिर कुनावार यांनी स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी केला असा माझा या माध्यमातून स्पष्ट आरोप आहे. या सर्व गोष्टी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आज गरज आहे. विकास नेमका कोणाचा हा खुप मोठा संशोधनाचा विषय आहे असं सर्व सामान्य जनतेला वाटायला लागले.

Previous Post

उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

Next Post

पुणे: आम्हच्या कडे काय बघते म्हणून चार आरोपींनी केली दोघांना शिवीगाळ करुन, लाकडी बांबु व बेल्टने मारहाण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: आम्हच्या कडे काय बघते म्हणून चार आरोपींनी केली दोघांना शिवीगाळ करुन, लाकडी बांबु व बेल्टने मारहाण.

पुणे: आम्हच्या कडे काय बघते म्हणून चार आरोपींनी केली दोघांना शिवीगाळ करुन, लाकडी बांबु व बेल्टने मारहाण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In