राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पोलिसांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल हादरले आहे.
मुंबईच्या वरळी येथे मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायाचे गळफास घेत आत्महत्या केली आहे. इंद्रजीत साळुंखे वय 27 वर्ष असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. तो स्थानिक सशस्त्र पोलीस दलात भोईवाडा येथे कार्यरत होता. इंद्रजीत साळुंखे यांनी वरळी येथील पोलीस तरण तलावाशेजारी असलेल्या अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
27 वर्षीय पोलीस शिपायाचे इंद्रजीत साळुंखे याने गळफास घेण्यापूर्वी गळ्यात फास लटकवलेला फोटो काढून तो फोटो त्याच्या प्रेमिकेच्या मित्राला पाठवला. ज्यामुळे त्याने सुसाईड केल हे आपल्या प्रमिकेला कळणार. आत्महत्या करण्यापूर्वी इंद्रजीत साळुंखे आणि त्याच्या प्रमिकेमध्ये काही कारणामुळे वाद झाले होते. आपल्या प्रेमी इंद्रजीत हा इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर दुसऱ्या मुलीशी बोलतोय हे प्रेमिकेला कळले म्हणून ती नाराज होती. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा इंद्रजीत याने गळफास घेत आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत साळुंखे गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम करत होता. एप्रिल महिन्यापासून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. मृतक पोलीस दुसऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्रामवर बोलायचा ज्यामुळे प्रेमिका आणि त्याच्यात वाद झाला. सोमवारी संध्याकाळी 4.00 वाजताच्या दरम्यान वरळी सी-फेसजवळ दोघांचे भांडण झाले. त्यानंतर 6.00 वाजताच्या सुमारास इंद्रजीत साळुंखे याने प्रेमिकेला दादर स्टेशन सोडले. त्यानंतर साडे सहा वाजता त्याने त्याच्या प्रेमिकेला सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि रात्री 10 वाजताच्या सुमारास गळफास घेत स्वत: जीवन संपवले.

