राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी मोबा.8779494512
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून चैत्यभूमीवर येत येत असतात. यावेळी भीमरावाना बाबासाहेब बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा लोकांना विसर पडतो असतो.
सर्व अनुयायांना आव्हान करण्यात येत आहे की, येत्या ६ तारखेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण दिन आहे तर या दिवशी दादर चैत्यभूमी वर लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातुन भिम अनुयायी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, ही खूपच मोलाची बात आहे पण ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव होण्यासाठी जे कष्ट माता रमाईने केले त्याची आपल्या लोकांना विसर पडतांना दिसत आहे, ही खंत वाटत आहे, “त्यागमूर्ती रमाई यांचे अंतविधि वरळी या समशान भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते.
जेवढे आपल्या साठी चैत्यभूमी आहे तेवढच हे रमाईचे अंतविधि झालेली भूमी आहे हे नाकारता येत नाही, पण हजारो किलोमीटर चालून चैत्यभूमी वर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाल्यावर अवघ्या २ किलो मीटरच्या हाकेच्या अंतरावर बाबासाहेबांची रामू, त्यागमूर्ती नऊकोटीची माता रमाई यांचे स्मारक आहे तिथे आपण गेले पाहिजे तरच डॉ बाबासाहेब यांना वंदन कराल ते पूर्णतः होईल. असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात आले आहे.

