प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यासह वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या नशेने तरुणाईचे भविष्य अंधारमय होत आहे. त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आदेश देत असले तरी काही स्थिकणी पोलिसांच्या जयचंदमुळे नशेचा कारोबार जोमात सुरू आहे.
राज्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असून ड्रग्जमाफियांना पोलिसांचीही मदत मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा शुक्रवारी (ता. ८) विधान परिषदे मध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर ड्रॅग माफियांशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन आढळले तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कलम 311 अन्वये तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
आमदार अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता. खोपोलीत 70 ते 80 किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांची बैठक घेतली होती. त्यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्यात पोलिस विभागातर्फे ड्रग्जविरोधात लढाई सुरू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यांतील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते.
काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळेच विशेषतः संभाजी नगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

