विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायत तर्फे गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रात विविध योजनांद्वारे अनेक विकासात्मक कामे सुरू आहे. विकासाच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा आहे. मात्र नगर पंचायतचे अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमत करून भ्रष्टाचार करून माल लुटत आहे. अशा खळबळजनक आरोप गावकऱ्यांनी लावला आहे.
एटापल्ली नगर पंचायत द्वारे बस स्थानका समोरच्या गल्ली मध्ये प्रफुल्ल कंदिकुरवार ते शादुल शेख ह्यांच्या घरापर्यात सिमेंट कांक्रेट रोड व पाईप ड्रेनचे वार्ड क्रमांक १० मध्ये काम सुरू केले आहे. अंदाज पत्रकात मुल्यांकन तक्त्यानुसार आधी खोदाई करून त्यानंतर १५ ते २० से.मी ०८ मि. मिटर गीट्टीने हाताबाहेर करून १ – ४ – ८ प्रमाणात बेड कांक्रेट करून त्यावर पालीथीनने लेप दिल्यानंतरच आयएसआय दर्जाचे पाईप वापरने बंधनकारक आहे. शिवाय त्यावर डांबर पट्टीने लीकप्रुफ करण्यात आले पाहिजे व अंदाजपत्रकात १५ ते २० से. मी मुरूमथर अंथरूनच काम दर्जेदार होणे संभावित आहे. अंदाजपत्रकात मटेरियल वरच रॉयल्टी आकारला जातो व शेवटी पाईप फीट नंतर टेस्ट दिली जाते असे बंधन आहे.
परंतु नगर पंचायत प्रशासन ज्यात मुख्याधिकारी, संबंधित अभियंता ह्यांनी या विकास कामाकडे डोळेझाक करणे म्हणजे लोकांचा विश्वासघात करणे होय. सदर बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असुन कोणत्याही प्रकारची दबाव, बेड कांक्रेट, पालीथीन, आयएसआय पाईप, डांबर पट्टी, १५ ते २० से.मी मुरूमथर नाही.
अशा प्रकारे नगर पंचायत जवळपास २२३१००० बावीस लाख एकतीस हजार रूपये खर्च करून काम थातूर मातुर दर्जाहीन असे संपुर्ण नगर पंचायत क्षेत्रात बांधकाम सुरू आहे. हे कामे असे दिसून येत आहे तर अजून पण विकास कामात मोठ्या प्रमाणात साठगाठ तर नाही झाली ना? अशी शंका निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी ह्या सर्व प्रकारच्या कामाची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

