नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची निर्घृणपने हत्या केली. आरोपीने आपल्याच पत्नीची, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची हत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री मोठे हत्याकांड घडले आहे. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचं वातावरण आहे. आरोपी जावई विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.
पती पत्नीचे नाते हे विश्वासावर चालते त्यात एकदा संशयाचे भूत मनात शिरले की त्याचे पर्यावसन हे नेहमी दुःखद होते. अशाच संशयातून एका नराधम पतीने आपल्या सासरच्या लोकांची हत्या केली. रेखा गोविंद पवार पत्नी, पंडित भोसले सासरा, ज्ञानेश्वर भोसळे मेव्हणा आणि सुनील भोसले मेव्हणा अशी हत्या करण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत. तर या हल्ल्यात आरोपीची सासून रुखमा भोसले या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी नराधम जावई,गोविंदा वीरचंद पवार रा. कळंब याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपीला गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्या दोघांचे भांडण झाले आणि आरोपीची पत्नी रेखा ही माहेरी निघून गेली. याचा आरोपीला प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरात मंगळवारी रात्री उशीरा त्याने सासूरवाडी गाठली. तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.हत्येनंतर तो फरार झाला, पण अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

