Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बँकेसाठी नागरिकांची पायपीट सुरूच, जारावंडी परिसरातील समस्या, सरकारचे दुर्लक्ष, कधी मिळणार न्याय?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बँकेसाठी नागरिकांची पायपीट सुरूच, जारावंडी परिसरातील समस्या, सरकारचे दुर्लक्ष, कधी मिळणार न्याय?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जारावंडी हे गाव एटापल्ली तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. या अतिदुर्गम परिसरात अद्याप बँकेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी तब्बल 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुक्‍यात जावे लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून येथे राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेची स्थापना कधी होणार, असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

जारावंडी परिसराचा लगतच्या आदिवासी भागातील 50 ते 60 गावांशी संपर्क जोडला आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्येने हा परिसर व्यापला आहे. परंतु, या परिसरात बँकेची सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. बँक व्यवहाराबद्दल नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांना बँक व्यवहारासाठी 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुका गाठावा लागतो. आजकाल बॅंकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असून प्रत्येक कामासाठी बॅंकेचे खाते अनिवार्य झाले आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसाहाय्य, गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाच्या आर्थिक अर्थसाहाय्याचा लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीककर्ज, सोने तारण, इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेचे आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे एकंदरीत सर्वच व्यवहार बँकेमधून होत आहेत. परंतु, जारावंडीत बँकच नसल्याने नागरिक या सर्व गोष्टीपासून वंचित आहेत.

जारावंडी परिसरात राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांना थेट 55 किमी गाठून एटापल्लीला जावे लागते. तिथेही रोजच गर्दी असते. याशिवाय नेटची चांगली सुविधा नसल्याने अनेकवेळा लिंक फेल होते. तिथे बसण्या, उठण्याची पुरेशी सुविधाही नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येऊन ते खाली पडण्याचे प्रकारही घडत आहेत. अशात पैसे भरण्या व काढण्यासाठी सुमारे 55 किमी अंतरावर गेलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागते. म्हणून या सर्व बाबी जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बॅंकेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

इंटरनेट पासून वंचित: एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. परंतु नेटवर्क अभावी जारावंडी- कसनसुर परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनाच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. जारावंडी कसनसुर, दिंडवी, भापळा, वडसाखुर्द सोहगाव घोळसुळ सेवारी गुडाम इत्यादी परिसरातील गावातील हजारो नागरिकांना इंटरनेट च्या सुविधे पासून वंचित राहावे लागत आहेत

जारावंडी परिसरात जवळपास 50 ते 60 गावांचा समावेश आहे त्या गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो, तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था फक्त जारावंडी परिसराचीच नसून संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.
तरी मा जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्षदेऊन ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी कळकळीची मागणी जारावंडी कसनसूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मला निराधार योजनेतून महिन्याकाठी आर्थिक सहाय्य मिळतो परिसरात बँक नसल्याने सरड तालुक्याला जावा लागतो आणि जाण्यासाठी एकच बस असल्याने अनेकदा काम न करताच परत यावा लागतो त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत :नीलकंठ मोहूर्ले जेष्ठ नागरिक

Tags: महाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने राजुरा तालुक्यातील 65 नागरीकांना विविध योजना प्रमाणपत्राचे निःशुल्क वाटप.

Next Post

अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले

अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In