व्ह्याली फाऊंडेशन ने दिला मानाचा पुरस्कार.
प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, सीमा फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमाताई सुरूशे यांना या वर्षीचा व्हेली फाऊंडेशनचा वतीने देणाऱ्या येणारा मनाचा समजल्या जाणारा राष्ट्रीय सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा मनाचा पुरस्कार दरवषी देण्यात येत असतो. यावर्षी हा पुरस्कार सीमा सुरुशे यांना देण्यात येणार आहे.
सीमा फाऊंडेशनचा वतीने महिलासाठी कार्य.
सीमाताई सुरूशे या मागील अनेक वर्षांपासून आपल्या सीमा फाऊंडेशनचा वतीने महिलासाठी कार्य उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांनी महिला सक्षमिकरण करण्यासाठी महिलांसाठी अनेक बैठकीच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले. त्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे. त्यांनी अनित रूढी परंपरा फाटा देत विधवा महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांनी समाजाने हीन समजल्या जाणाऱ्या किन्नर (तृतीयपंथी) याच्या साठी भरीव कार्य केले आहे.
सीमा फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या सीमाताई यांनी वाशिम जिल्हासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपल्या कार्याची व्याप्ती वाढवत कार्य करत आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण व त्याच बरोबर आर्थिक साक्षरता या विषयावर सीमाताई यानी महिला एकत्र करून जिल्ह्यात महिला मेळावे आयोजित केले. महीला साक्षर होऊन त्यांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय सह सर्व क्षेत्रात प्रगती केली पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून महिलांना प्रोत्साहन देत आहेत. याच बाबीचा विचार करत व्हली फाऊंडेशनने त्यांना राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्ह्यात सीमाताई सुरूशे यांचे सगळीकडे अभिनंदन होत आहे.

या कवितेच्या ओळीतून सीमाताई…
महिला हिताचा विचार भारी,
वेळे प्रसंगी काट्यावरही चालणारी सीमाताई न्यारी..
आपल्या अस्तित्वाने सर्वांवर मात करणारी
समाजातील बंधने तोडून नव उभारी देणारी,
प्रत्येकाच्या जीवनात सखी सारखी उभी असलेली सीमाताई न्यारी.
कधीही न घाबरणारी नारी अशी.
अन्यायावर तुटून पडणारी किमया जशी.
अशी ही नारी सीमाताई आहे सर्वांवर भारी..
सीमाताई सुरूशे एक सामाजिक कार्यकर्त्या… महाराष्ट्रातील वाशिम जिल्हातील मालेगाव येथील सीमाताई सुरूशे महाराष्ट्रातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि एक प्रामाणिक राजकीय नेत्या आहेत. सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे हा बेत नेहमी त्यांचा ध्यानी मनी वसलेला आहे. त्यासाठी कुठलीही तडजोड नाही. अगोदर सर्वांचे कल्याण मग माझे हे विचार त्यांना इतर राजकीय पक्षाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पेक्षा वेगळं करते.
सीमाताई या मागील अनेक वर्षांपासून 100 टक्के समाजकारण करून त्यांनी आपला सामाजिक दर्जा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. सीमाताई यांच्या आचरणातुन, विचारातुन आयुष्य कसे जगावे, कसे असावे हे शिकवतात. समाजाचे कार्य करून प्रत्येक समाजाच्या मनरुपी उरावे.. असा त्यांचा जगण्याचा आदर्शपणा. घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सीमाताई समाजकारण करण्यासाठी राजकरणात आल्या. त्यांचा विविध पैलूंवर अभ्यास करून आपल्या परिसरातील नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी त्या नेहमी झटत असतात.

