पोलिसाच्या कारवाईवर गावकऱ्यांचा संकोच. न्याय मिळण्याकरिता भीम आर्मी विदर्भ प्रमुख कार्यालय अंकुश कोचे यांना अल्लीपूर ग्रामस्थांनी व अपघाती झालेल्या परिवारांनी दिले निवेदन.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अल्लीपूर:- येथे अवैध रेती माफिया याच्या भरधाव टिप्परने दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी ऑटोला मागून जोरात दिली धडक चार ते पाच गंभीर जखमी तर एकाचा 15 दिवसा दरम्यान मृत्यू झाल्याने याबाबत योग्य कारवाई करण्यात नाही आल्याने गावकरी आक्रमक झाले आहे.
अल्लीपूर गावमध्ये अपघातामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातामुळे मृत्यू झालेल्या मेघरे परिवारावर संकटाची काळ तर ऑटो चालक यावर दैनंदिन जीवनामध्ये घर कसे चालवावे उपासमारीची वेळ तर बाकी गंभीर दुखापतीमुळे उपचार घेण्याकरिता आर्थिक बाजूने सक्षम नसल्याने जिवंत राहावे की मरावे या परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात रोज वाळू माफिया द्वारा रेती तस्करी व पोलीस प्रशासना द्वारा कारवाई होतात वृत्तवाणीमध्ये प्रकाशित होऊन दिसतात पण यावर आळा न लागल्यामुळे अल्लीपूर येथील ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अपघातास जिम्मेदार कोण? परवानगी नसलेल्या घाटावर आशीर्वाद कोणाचा नागरिकांचा प्रश्न आहे?
पुष्पा मेगरे, सेजल मेघरे, अर्पिता आंबटकर, ममता गिरडे, लहान मुलगा संग्राम गिरडे, विलास हजारे, असे अपघाती नागरिकांचे नाव आहे. सदर घटना तेलाराधे यांच्या शेताजवळ ऑटो चालत असताना मागून एका रेती भरलेल्या भरधाव टिप्परने धडक मारून उडवले आणि टिप्पर तिथेच न थांबता निघून गेला यामध्ये ऑटोतील लोकांना गंभीर दुखापत झाले यांना उपचारासाठी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले यामध्ये एका इसमाचा 15 दिवसात मृत्यू झाला परंतु पोलीस प्रशासना द्वारा परिवाराच्या माहिती वरून टिप्पर आजपर्यंत जप्त करण्यात आला नाही. टिप्परचा शोध सुद्धा लागला नाही कोण घटनेचे आरोपी आहे यावर सध्यातरी पोलीस प्रशासन द्वारा खुलासा करण्यात आलेला नाही व परिवाराला माहिती सुद्धा देण्यात आले नाही. सदर तक्रार अज्ञात वाहना विरुद्ध लिहिण्यात आली आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की साक्षीदार असून टिप्परची ओळख करणारे नागरिक तसेच टिप्पर क्रमांक सुद्धा गावकऱ्यांकडे आहे परंतु यावर पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष कसे करत आहे?
यावेळी नागरिकांनी निवेदन मध्ये नमूद करून दिले ज्या परिसरात रेतीघाट चालत आहे त्या परिसरातील वाळू माफिया कुटुंबाच्या घरी जाऊन दमदाटी दाखवण्याचा प्रयत्न केले पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन चुपचाप बसा असे सुद्धा गोपाल चंपतराव मेघरे यांच्या परिवारास बोलले या अन्यायावर न्याय मिळण्याकरिता आज दिनांक 4 मार्च भीम आर्मी कार्यालय येथे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांना निवेदन देण्यात आले व संविधानिक मार्गाने लढून मेघरे ऑटो चालक व गावातील नागरिकांना न्याय मिळून द्या अशी अर्जाद्वारे विनंती करण्यात आली.
त्यावेळेस उपस्थित विकास शंकरराव हजारे गणेश वामन गुल गाणे इत्यादी लोक उपस्थित होते भीम आर्मी विदर्भ प्रमुख कार्यालयाकडून लवकरच पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक कार्यालय नागपूर पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई सदर प्रकरणाचे पाठपुरावा करून मेल व निवेदन देऊन सदर घटनेची योग्य ते चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असे परिवारांना बोलताना सांगितले.

