Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

24 वर्ष झाले आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटीं वर, कार्य न करता सम्राटाला धोक्याची घंटा तर नाही ना?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
24 वर्ष झाले आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटीं वर, कार्य न करता सम्राटाला धोक्याची घंटा तर नाही ना?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज काल थोडे फार रोड बनवले आणि नाल्या बनवल्या की कुणी पण स्वतःला कार्यसम्राट विकास पुरुष म्हणून मिळवायला लागतो आणि नागरिकाच्या हिताचा मुख्य प्रश्न तसाच ताटकाळत ठेऊन त्याकडे दुर्लक्ष करतो आणि निवडणूक जवळ आली की परत तो मुद्दा उकरून काढून त्यावर आपली राजकीय पोळी भाजतो. आणि नागरिक पण अशा राजकीय नेत्यांच्या भुलथापाना बळी पळून परत त्यांनाच मतदान करत असतात हे मागील अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्प हा तालुक्यातील एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. पण मागील 24 वर्षा पासून तो लटकला असल्याने या परिसरातील गांवकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशाच संताप या लोकसभा निवडणुकीत दिसून आला आणि विद्यमान खासदार यांनी घरचा रस्ता दाखवला. आजनसरा बॅरेज प्रकल्पामुळे विद्यमान आमदार यांना पण धोक्याची घंटा तर नाही ना अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षे पर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. परत २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

ना कामाला सुरुवात ना सिंचनाचा लाभ :
वीस वर्षांपासून केवळ आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचविण्या साठी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बरेच प्रकल्प अनेक वर्षे खितपत पडल्या मुळे पूर्णत्वास गेलेले नाहीत. आणि अद्यापही या प्रकल्पाची एक वीट ही रचल्या गेली नाही, ही आजपर्यंतची वस्तू स्थिती आहे. परिणामी या प्रकल्पाची किंमत ८६० कोटींवर पोहोचली असून हा प्रकल्प होणार नाहीच, अशीच समजूत परिसरातील शेतकऱ्यांची झालेली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पा करिता प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रकल्पामध्ये २२.२४ द.ल.घ.मी. पाणी साठविले जाणार असून सिंचन क्षमता २८ हजार ८० हेक्टर आहे. हा आजनसरा बॅरेज प्रकल्प दोन दशकापासून रखडलेला आहे. हिंगणघाट तालुक्यातील ४० गावे तर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ८ गावांचे सिंचन यामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे १ हजार ८१.३८ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे अधिकार गोठविण्यात आले होते. परंतु प्रकल्पाचे कामच रखडल्याने शेतकऱ्या समोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला. आर्थिक अडचणींमुळे उपचाराअभावी काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांच्या मुलांच्या शिक्षणासह विवाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मिळवून शेतजमिनी कसायला सुुरुवात केली.

आमदार कुणावार कडून ही अपेक्षा भंग या वीस वर्षांच्या काळात अनेक मंत्री या प्रकल्पाला भेट देऊन गेलेत. त्यांनी वेळोवेळी हा प्रकल्प तत्काळ पूर्ण केला जाईल, असे आश्वासन दिले, पण आता दोन दशक उलटले तरी कामाला सुरुवात झाली नाही. त्यात ०२ आक्तोंबर २०२३ ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महीन्यात आजनसरा बैरेज चे टेंडर निघणार असल्याची घोषणा केली होती. पण काहीच झाले नाही. शेतकरी विचारतं आहे की हा चुनावी जुमला तर नव्हता ना?

Tags: आजनसरा बॅरेज प्रकल्पआमदार समीर कुणावरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभाजपावर्धा जिल्हावर्धा जिल्हाधिकारीहिंगणघाट
Previous Post

नशे के कारोबारियों पर आपरेशन “प्रहार का असर पूरी गैंग धरावी नेटवर्क ध्वस्त “मैहर पुलिस ने आरोपियों के कब्जे में.

Next Post

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In