संदीप भाऊ पोडे यांचा विविध मागण्या सह विसापूर ग्रामपंचायत वर धडकला मोर्चा
सौ. हनिशा दुधे बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
बल्लारपुर:- तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत आपल्या क्षेत्रातील नागरिकाच्या समस्या सोडवत नसल्यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायत विरोधात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काडून गावातील समस्या लवकऱ्यात लवकर सोडविण्यासाठी निवेदन दिले.
हा मोर्चा संदीप भाऊ पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नेऊन खालील प्रमाणे विसापूर मधील अत्यंत गरजेचं अश्या मागण्या केलेल्या आहे.
खालील प्रमाणे लिखित असणारे मुद्देसुद मागण्या
1) भिवंकून्ड येथील नागरिकांना तात्काळ घर टंक्स पावत्या देऊन त्यांना लाईंट, पानीं, रस्त्या ची व्यवस्था घ्या.
2) वॉर्ड न. 5 येथे तात्काळ 5 इलेट्रिक्ट पोल देऊन लाईनची व्यवस्था करा.
3) विसापूर ते पेपर मिल गगेट पर्यंत लाईटची व्यवस्था करा.
4 ) ग्रामपंचायत नीं पुढाकार घेऊन रात्रौपाळी विसापूर PHC ला डाक्टर ची व्यवस्था तात्काळ करा.
5) अपघातचे प्रमाण वाढले असून पुरबुडी मधील नालीचे बांधकाम तात्काळ ससुरु करा.
6) तुकडोजी चौक येथे निधी देऊन तुकडोजी चौक मागणी प्रमाणे सोन्दर्यकारण करा.
7) नागरिकांची मागणी असताना सुद्धा गावात फॉगिंग मशीन व डास फवारणी का बर केली नाही. यांच उत्तर विसापूर ग्रामपंचायत नीं पूर्ण गावाला सांगणे.
या प्रकारचा मागण्या संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी केल्या आहे. संपूर्ण विसापूर वासिंयंचे या मागणी कडे लक्ष वेधले आहे. कि ग्रामपंचायत हे काम कधी पूर्ण करतील. याकडे गावातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.