उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली आणि श्रावस्थी विहार या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २१ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सकाळी 9.00 वाजता संस्थेच्या संचालक, पदाधिकारी, उपासक आणि उपासीका यांनी धम्म निनाद सेंटर केरे वाडी येथे वृक्षारोपणचां कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश दिला. त्यानंतर 12.00 वाजताच्या सुमारास धम्मदेसना धम्मच्यारी ज्ञानसेन (उबाळे सर) यांनी धम्मदेसना दिली. त्यांनी आषाढी पौर्णिमेच महत्व विशद केलं. त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन पुढे गुगवाड येथे आथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट धम्म भूमी येथे भेट दिली वंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थित बौध्द भिखु यांनी सर्व उपासकांना धम्मदेसना दिली.
आषाढी पौर्णिमेच्या निमित्त साधून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण सहलीचं नियोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे धम्मभूमी आणि धम्म निनाद सेंटर ची सहल आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर संध्याकाळच्या सदरात भंते महाथेरो, डॉ. कश्यपायन व इतर मान्यवर याच्या हस्ते गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्रीसरन व पंचशील घेण्यात आले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे खजिनदार माने सर यांनी केले. त्याच प्रमाणे डॉ. भदंत यश कश्यपायन यांचा परिचय संस्थेचे सहखजिनदार जगन्नाथ आठवले यांनी दिला. त्यानंतर डॉ. यश कश्यपायन यांनी आषाढी पौर्णिमेच महत्व धम्मातील तत्वे आणि बौद्ध धम्म हत्तीच्या पायाचा ठश्या प्रमाणे विशाल आणि महान असल्या चे विदित केले. त्यानंतर संस्थेचे माजी सचिव प्रा. भटकर सर यांनी आषाढ पौर्णिमेला भगवान बुध्दाच्या जीवनात घडलेल्या पाच घटना साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या. नेहमी प्रमाणे अमोल सरकार यांनी संस्थेस लाऊड स्पीकर आणि भंते याना धम्मदान दिले त्या मुळे सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि चिटणीस जितेंद्र कोलप आणि सुहास धोत्रे याचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जितेंद्र कोलप यांना भंते यांनी उपोसथ वृताचे अष्टशिल ग्रहण करून घेतले. पाऊस असून ही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. शेवटी संस्थेचे आध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी आभार मानले.
तसेच वर्षावास कालावधी मध्ये प्रत्येक गुरवारी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भंतेजी उपस्थित राहून धम्मदेसना देतील याची नोंद घ्यावी तसेच प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 11 आणि प्रत्येक पौर्णिमेस 7 ते 9 यावेळेत बुध्द वंदना आणि धम्म देसना होणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन संस्थेचे संयोजक व आयोजक याचे तर्फे करण्यात आले आहे. शेवटी धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

