प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हिंगणघाटतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटात केले आणि अनावरण करून या घटनेला एक वर्षही लोटले नाही, तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. याप्रकरणी बांधकाम मंत्री यांनी राजीनामा देऊन अवघ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी व मुख्यमंत्री यांनी याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करत भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अवमान सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिलजी राऊत, शहाराध्यक्ष बालू वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, प्रदेश सचिव प्रशांत लोनकर, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, सुचिता सातपुते, विद्या गिरी, सुजाता जांभूळकर, दिपाली रंगारी, नालंदा राऊत, अमिता पूनवटकर, सुनीता तांमगाडगे, अजय पर्वत, सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, गणेश जोशी, मंगेश गिरडे, प्रल्हाद तूराळे, राजू मेसेकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, उमेश नेवारे, बबलू खान, प्रविण कलोडे, बचू कलोडे, हेमंत घोडे, राजू सराटे, विपुल वाढई, पंकज भट्ट, सुशील घोडे, आकाश हूरले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

