प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य शासननाच्या विविध लोकाभिमुख योजना तहसिल व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रशासन गाव की ओर उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दि.19 ते 24 डिसेंबर या कालावधीत समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहिम, उपक्रमाचे शिबिरे आयोजित करुन सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला.
सुशासन सप्ताह निमित्त जिल्ह्यात विविध कार्यालया तर्फे उपक्रम राबविण्यात आले असून या निमित्त सेवाग्राम येथे ई-सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आधार कार्ड, शासनाच्या विविध योजनांची माहिती, आभा कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, अशा विविध प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी कळविले आहे.

