Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

मुख्यमंत्र्यांच्या 7 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता प्रशासन सरसावले वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी घेतला आढावा

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 12, 2025
in वर्धा, विदर्भ
0 0
0
मुख्यमंत्र्यांच्या 7 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता प्रशासन सरसावले वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी घेतला आढावा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू असलेल्या या कृती कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज येथे दिल्या.

पुढील शंभर दिवसांत राबवायच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

राज्यात प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांनी सात कलमी कार्यक्रमाबाबत काय कार्यवाही केली, याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे. आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे ही कामे प्राधान्याने हाती घ्यावी.

नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवावेत. पुढील शंभर दिवसांत प्रलंबित कामांची संख्या शून्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी लाभार्थ्याशी, नागरिकांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणी विषयी प्रतिक्रिया जाणून घेवून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी देवून तेथील सुविधांचा आढावा घ्यावा. तसेच दर शुक्रवारी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून निरुपयोगी साहित्य, कागदपत्रांची विल्हेवाट लावावी, असे त्यांनी सांगितले.

जात प्रमाणपत्र, नझुल पट्टे वाटप, घरकुल मंजुरी, जन्मदाखला, प्रॉपर्टी कार्ड, जमीन मोजणी, फेरफार, पांदण रस्ते मोजमाप, वैयक्तिक लाभाच्या योजना, दस्त नोंदणी, भाग नकाशे, बांधकाम परवानगी देणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारीचे निर्धारित वेळेत निवारण व संवाद भेट याबाबत सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांसोबत सौजन्यपूर्ण व्यवहार करावा व नागरिकांची कामे निर्धारित वेळेत करावी. विविध प्रमाणपत्र व योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

1) विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा. 2) ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा. 3) शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा. 4) नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. 5) उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 6) शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात. 7) lशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या.

या सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

Tags: Wardhaमुख्यमंत्र्यांच्या 7 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता प्रशासन सरसावले वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी घेतला आढावा
Previous Post

रुग्णवाहिका असतानाही देवाडा येथील डॉक्टरांची अपघातग्रस्ताला जीवघेणारी टाळाटाळ, अखेर छोटा हत्तीत आणले रुग्णालयात.

Next Post

श्री मारुती स्वामी देवस्थान पुराना मंदिर भिल गाव श्रीराम दरबार स्थापना दिवस भिल गाव के नागरिकोने उत्साहसे मनाया.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री मारुती स्वामी देवस्थान पुराना मंदिर भिल गाव श्रीराम दरबार स्थापना दिवस भिल गाव के नागरिकोने उत्साहसे मनाया.

श्री मारुती स्वामी देवस्थान पुराना मंदिर भिल गाव श्रीराम दरबार स्थापना दिवस भिल गाव के नागरिकोने उत्साहसे मनाया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In