Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

!! शिक्षण आणि जात !!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 1, 2022
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
!! शिक्षण आणि जात !!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखिका: डॉ. प्रगती सुभाष, नागपूर

मनुष्याच्या शरीर, मन आणि बुद्धीचा विकास करणारी प्रणाली शिक्षणातून विकसित होते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व आत्मगौरव निर्माण होतो. समाजात पूर्वापार चालत आलेला आणि अजूनही अस्तित्वात असलेला जातिभेद थांबवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जातीभेद ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. जात ही मानवाने निर्माण केलेली सर्वात वाईट गोष्ट आहे. ज्या समूहाचे जातीहित जातीव्यवस्थेत दडलेले आहे, तो समाज जातीव्यवस्था प्रबळ करण्याचा प्रयत्न करतो. तर ज्याच्यावर जातिव्यवस्थेेतून अन्याय होतो तो समाज ती नष्ट व्हावी यासाठी प्रयत्नरत असतो. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र अश्या ठिकाणी जर जातीव्यवस्था पाळली जात असेल तर आम्ही कोणत्या जगात वावरतो? हा प्रश्न निर्माण होतो. जाती विरहित समाजरचना निर्माण करण्याची शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते. असे असले तरी सध्यस्थिती बघतांना आणि विदारक सत्य उघड करताना असे निदर्शनास येते की, बालवयातील विद्यार्थ्यांनाही जातीच्या विषापासून संरक्षण नाही. शाळेतील मध्यान्न भोजन बनविणारी महिला दलित समाजाची असेल तर सवर्ण विद्यार्थी चक्क जेवण सोडून देतात. दलित विद्यार्थ्यांना वेगळे बसवून जेवण दिले जात असल्याचे प्रकार खेड्यापाड्यातून निदर्शनास येतात. गुजरातमध्ये तर दलित समाजाच्या दहा वर्षांच्या मुलींना शाळेचे संडास साफ करण्यासाठी भाग पाडले जाते. स्वतःचा काहीही दोष नसताना केवळ विशिष्ट जातीत जन्मली म्हणून कठोर शिक्षा केली जाणारी हीच बालके मग शाळेपासून दुरावतात. एवढेच नव्हे तर शिक्षा कधी-कधी इतकी क्रूर असते की इंदर मेघवाल सारख्या एखाद्या चिमुकल्याला शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून आपला जीव गमवावा लागतो. यावरून हे निदर्शनास येते की, आजही अस्पृश्यता पाळली जाते. जेव्हा की भारतीय संविधानाच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता पाळणे हा दखलपात्र गुन्हा आहे. परंतु या कलमाचे सर्रास उल्लंघन होतांना दिसते.

आधुनिक काळातही जातच नव्हे तर पोटजातदेखील आमचा पाठलाग करतेच आहे. जातीविरहित समाजरचना निर्माण होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आयुष्यभर लढा दिला. परंतु आम्ही त्या महापुरुषांनाच जातीच्या चौकटीत बंदिस्त केलेले आहे. जातीचे चटके जर आजही नवीन पिढीला सहन करावे लागत असतील तर आमच्या शासनव्यवस्थेवर, शिक्षणप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. जातीविरहित समाजरचना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. परंतु शिक्षकच जर जातीवादी विचारसरणी असणारे असतील तर ते समाजातील नवीन पिढीला काय देतील? आम्ही नवीन पिढीच्या पुढे कोणते आदर्श निर्माण करतो? एक शिक्षक म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत काय? याची चाचपणी करणे गरजेचे वाटते. वास्तविक शिक्षकाला शिक्षणाची प्रणाली व शिक्षणाचे तत्त्वज्ञान याचा संयोग साधून विद्यार्थ्यांमध्ये जाण्यासाठी तयार करावे लागते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जातीभेदविरोधी विचार पेरणे, आधुनिकतेवर भर देऊन शिकविणे हे एका आदर्श शिक्षकाचे लक्षण होय. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचा इतिहास, अस्पृश्यतेचा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. बालमनावर संस्कार करताना जातीय आधारित विचारसरणीला खतपाणी न घालता विद्यार्थ्यांमध्ये ‘समानता’ हे मूल्य रुजविण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर येऊन पडते. म्हणून शिक्षकांनी नवसमाज निर्मितीमध्ये आपले योगदान देताना जातीभेदविरोधी विचार विद्यार्थी मनावर बिंबविणे गरजेचे आहे. तरच एक सक्षम समाजाचा पाया रोवण्यात शिक्षक आपली जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होतील.

Previous Post

अहमदनगर जिल्ह्यात आजपासून कलम 37 (1) अन्वये प्रतिबंध घालण्याचे आदेश लागू; यावर असेल बंदी.

Next Post

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अजय चंद्रकांत विटकर व त्याच्या इतर ७ साथीदारांवर मोक्का अंतर्गत करवाई…..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अजय चंद्रकांत विटकर व त्याच्या इतर ७ साथीदारांवर मोक्का अंतर्गत करवाई.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In