* डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक 28 मार्च 2025 गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेला आहे परंतु सातबारावर नावे असलेल्या एकाच्या नावाने अर्ज सबमिट केलेला आहे. अर्जदाराचे नाव सातबारावर आहे परंतु सातबारावर असलेली आराजी ही सातबारावर सामायिक क्षेत्र अशी नोंद केली असल्याने कुणाच्यातरी एकाच्या नावाने आराजी दर्शविण्यात येत आहे. सात बारा धारकांचे नाव या रकान्यामध्ये अर्जदाराचे नाव लिहिले असता आराजी शून्य दाखवते त्यामुळे ऑनलाइन अर्ज सबमिट करता येत नाही. त्यानुसार सातबारा वरील ज्या नावाने आराजी दर्शविली जाते ते नाव त्या ठिकाणी टाकलेले आहे. अर्जदाराचे नाव व सात बारा मधील नाव यात फरक असल्याने महावितरण कंपनीने सदर अर्ज प्रलंबित ठेवलेला आहे .
शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सातबारा वरील सर्व व्यक्तींचे संमती ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा जोडलेले आहे व डिमांड म्हणून 22 हजार 971 रुपये ऑनलाइन पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भरलेले आहेत परंतु सदर अर्ज महावितरण कंपनीने पुढे फॉरवर्ड न केल्याने मागील तीन चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे मागेल त्याला सौर पंप योजना अर्ज प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप न बसवल्याने शेतीचा हंगाम जवळ असल्याने शेतकरी शासनाच्या या योजनेपासून शेकडी वंचित राहत आहे पुढे महावितरणच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. वास्तविक ऑनलाइन फॉर्म भरताना अर्जदार व सातबारा नाव वेगळे असल्याने त्याच वेळेस अर्ज सबमिट व्हायला नको होता परंतु दोन्ही नाव वेगळे असताना सुद्धा अर्ज सबमिट होत आहे याचा अर्थ जे संमती पत्र जोडलेले आहे त्यानुसार अर्ज मंजूर होणे अभिप्रेत आहे. याबाबत तहसीलदार यांना भेटून विचारले असता सहमती पत्र त्याच्यासाठी जोडले जाते सातबारा मध्ये सामायिक क्षेत्र दर्शविल्याने कोणाच्याही एकाच्याच नावाने आराजी दर्शविलेली जाते असे तहसीलदारांचे म्हणणे पडले कदाचित हा महावितरण कंपनीच्या पोर्टलचा दोष असावा असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या योजनेसाठी लागणारी रक्कम भरलेली असून व लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर केलेली असताना सुद्धा जर अर्ज मंजूर होत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात निर्माण होत आहे तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या समस्या कडे लक्ष देऊन तात्काळ ही समस्या दूर करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदरकर, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल भाऊ झोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये, महेश अलोणे,चामोर्शी तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर,वडसा तालुका अध्यक्ष रजनीकांत गुरनुले, कुरखेडा ता, अध्यक्षा रुपाली कावळे,अहेरी ता, अध्यक्ष नागेश मडावी यांनी केले आहे,

