Tuesday, December 9, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात “गांधी’ किया बदनाम हमीने”…!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 2, 2022
in Uncategorized, तंत्रज्ञान, देश विदेश, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात “गांधी’ किया बदनाम हमीने”…!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा.
मोबाईल 9823966282

आज २ आक्टोंबर महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा जन्मदिवस. खर तर भारत देशात आता, संत- महापुरूष त्यांच्या जयंती-पुण्यतिथी पुरतेच स्मरणात असतात. नंतर त्यांनी सांगीतलेला विचार हा प्रत्यक्ष जनजीवनात दिसत नाही. म्हनूच साधु-संत-महापुरूषांचा भारत विदेशी ताकतींच्या गुलामीवर जगत आहे. स्वदेशीचा नारा देत आमची मुल विदेशात विदेशी कंपनीत नोकरीला लागले त्यांची बोलतांनाची राष्ट्रभक्ती सांगते, ‘भारतात आमच्या गुणाला किंमत नाही. ‘ कारण त्यांना त्यांची किंमत रूपयात नाही डॉलर मध्ये हवी आहे.

मित्रांनो आमच्याच देशात आमच्याच महापुरूषांच्या जीवन चरीत्रा संबधात संभ्रम निर्माण केला आहे. वाद विवादात आमच्या संत -महापुरूषांच्या जीवनातील सत्य लोप पावुन असत्यावर धमासान चर्चा घडतात. महापुरूषांच्या चरित्रहनना पर्यंत आमची मजल जाते.

महात्मा गांधी ज्यांच्या विचारांना जगात सन्मान आहे. जगातील अनेक अभ्यासक विद्वानांनी गांधी विचारातून स्वतःच जिवन घडवल. पण ज्या देशात मोहन करमचंद गांधी नावाच वादळ जन्माला आले त्याचं देशान गांधीतील महात्मा नाकारत त्यांचे सत्याचे प्रयोग पुस्तकात बंदीस्थ ठेवत. थर्डक्लास कामाला ‘गांधी क्लास’ म्हणून हीनवल्या जांत. ‘गांधी बुढा’ म्हणून तरूण मनावर विकृत मानसीकता बींबवीण्याचं कट कारस्थान या देशात रोज घडत असते. तरी ‘महात्मा नावाचा गांधी संपल्या का संपत नाही?’ कारण गांधी बदनाम करण्याच मोठ साहित्य भारतात आजही सातत्याने प्रकाशीत होत आहे. अशा साहित्याची विक्री पण जोरात होते आहे. गांधीच या देशात बदनाम केला नाहीतर रयतेचा राजा छत्रपती शीवरायावर, जगतगुरू संत नामदेव, तुकारामांवर भ्रम निर्माण करणार साहित्य निर्माण केल्या गेल. संत गाडगेबाबा, तुकडोजीवर चमत्कारी साहित्य निर्माण होत आहे. आजही या संत-महापुरूषांन वरील वादग्रस्थ चर्चा संपत नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनात अनेक राष्ट्रीय महापुरूषांच्या भेटी झाल्या चर्चा झाली. त्यात महात्मा गांधीचा सहवासही त्यांना गांधीच्या इच्छेवरून लाभला. महात्मा गांधीच्या विचारांना राष्ट्रसंतांनी फार जवळून अनुभवल. सेवाग्राम आश्रमात एक महीन्यापेक्षा जास्त काळ गांधीच्या इच्छेवरून राष्ट्रसंतांचा मुक्काम होता.
सेवाग्राम मुक्कामात राष्ट्रसंतांची प्रकृती स्वास्थ बिघडले. तापाने काही दिवस शरीर फणफणत होत. महात्मा गांधीनीं स्वतः राष्ट्रसंतांची देखभाल केली. त्यांनी फरमान काढल होते. ‘तुकडोजी महाराजके प्रकृतीकी देखभाल हम करेंगे. ‘ असा स्नेहभाव होता दोन्ही महापुरूषांन मध्ये राष्ट्रसंत लिहतात-

“मैं गांधीजी का नही शिष्य रहा, ना गांधी मेरे कहीं भक्त रहे।
पर प्रेम था हम दोनों में बडा, वह मिट न सका कोई लाख कहे॥”

कारण अनेक विद्वान अती हुशारीने सांगतात की, “राष्ट्रसंत तुकडोजीवर महात्मा गांधी आणि विनोबां भावेंच्या विचारांचा प्रभाव आहे.”विनोबा तर लिहतात,” साहजिकच मला भूदानाच्या चक्रव्यूहात अडकलेला पाहून त्यांनी (राष्ट्रसंतांनी) मदतीसाठी धाव घेतली; आता त्यांच्या पुस्तकाला (ग्रामगीतेला) माझ्याकडून प्रस्तावना मागत आहेत.

मित्रांनो महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १०८ गीतांची गांधीनां श्रद्धांजली वाहली. ‘गांधी गीतांजली’ नावाने ह्या गीतांच पुस्तक प्रसीध्द आहे. त्यात एक गीत राष्ट्र संतांनी लिहल आहे.

गांधी किया बदनाम, हमीने गांधी किया बदनाम ॥
नहि माना उसका कुछ कहना, बिक गये झूठे दाम॥१॥
शराब पीकर गाँव बिगाडा, ‘नेता’ लेकर नाम ॥२॥

महात्मा गांधीच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांनी दारूचे घोट पाजत गाव बरबाद करून भारतीय लोकशाही बदनाम केली. आज तर गाधींचा चष्मा राजकारणांचा विषय ठरतो गांधी- गोडसेचा जय जय कार करीत. मात्र गांधी विचार दृष्टी कोणी स्वीकारत नाही.

घुसखोरी से खाये पैसे, छिपा न अब यह काम ॥३॥
धर्म नही और देश नही है, ऐसे हुए हराम ॥४॥
कुछ जो रहे नेक अबतक भी, भीखको लगे तमाम॥५॥

जे गांधी विचारांन प्रमाणे जगत आहे ते भीकेला लागलेत. माणूसकी धर्माला विसरून देशही देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होतो आहे. ही खंत राष्ट्रसंत गांधी जन्मशताब्दीला लिहतात. आज भारतीय लोकशाही कुठे आहे? चिंतन करावे लागेल.

उलटी बही योजना-गंगा, मरे श्रमिक बेकाम ॥६॥
देश- विदेश के सपने देखे, मनसे भये गुलाम ॥७॥
तुकड्यादास कहे न बचोगे , पडेगें सिरपर ‘बाम’ ॥८॥

मित्रांनो राष्ट्रसंतांनी केलेली भवीष्यवाणी आजही भारतात दिसत आहे. आजही विदेशी कंपन्यांचे उत्पादने आणि विदेशी कर्जात आमची श्रीमंती लोळते आहे. श्रमीकांच्या माथी कालची गुलामी आजही शाबुत आहे. दुसऱ्या एका गीतात राष्ट्रसंत लिहतात-

नहि गांधी का राज, आजका नहि गांधी का राज ॥
वे नही चाहते थे यह शिक्षा, करे देश मुँहताज ॥३॥
वे नहि चाहते थे यंन्त्रो का, बने गुलाम समाज ॥४॥
वे नहि चाहते थे श्रमिकों की, लुटे दुनिया लाज ॥५॥
कहता तुकड्या, वे चाहते थे, देश रहे सिरताज ॥७॥

मित्रांनो महात्मा गांधी न संपणांरा आणि संपवल्या जाणारा विषय आहे. तो एक विचार आहे. त्यांच्या विचारांना विरोध होत राहील. पण त्यांच्या जीवनातील सत्याचे प्रयोग आमच्या जीवनातील दुःखाना हिंमत देतात का ? याच चिंतन आपण करूं यां. जीवन आपल सुखी आनंदी करण्यासाठी.

Previous Post

सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांची कामगीरी फ्रॉड लोन अॅपचे कॉल सेंटर उध्वस्त …..

Next Post

1xbet Mobile Vebsayt Və 1x Wager Mobil Uygulama Indir 202

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

1xbet Mobile Vebsayt Və 1x Wager Mobil Uygulama Indir 202

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In