अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्ह्यातील कळमेश्वर येथील निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, संस्कृत कला खूप आवड असल्यामुळे ते सक्रिय सहभाग असतोच यामुळे रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्र विकासाचा उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा, व संस्थांचा विलोभनीय राष्ट्र गौरव सन्मान सोहळा रविवार दि.२७ जुलै रोजी सकाळी १० वा.स्थळ- पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा -२०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक तेजस बर्वे अभिनेता (संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका) यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवेंद्र काठे आमदार सोलापूर (युवा धोरण समिती विशेष निमंत्रित सदस्य), अभिजीत करपे युवा उद्योजक, बी.एन खरात, प्रकाश दिंडले अभिनेते (पाटलाच्या बैलगाडा व नटी न मारली मिठी), दिलीप घेवंदे अभिनेते (गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह), लक्ष्मी चव्हाण अध्यक्ष शांताई फौंडेशन सोलापूर, स्वाती तरडे अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे, शर्मिला नलावडे पाटील हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा पुणे इत्यादी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलित करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील निर्भीड व कर्तव्यदक्ष पत्रकार व न्यूज चॅनल रिपोर्टर युवराज मेश्राम यांना पुणे येथे शाल स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार २०२५ सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेश भांगे, गायक सदानंद मोरे, रामेश्वर पोहेकर, संगीताताई भक्ते, शाहीर गणेश मेश्राम, भीम शाहीर प्रदीप कडबे, मातृ रक्षा मासिकाच्या संपादिका स्वाती इंगळे, सुफी सय्यद क्षमसोदिन यांनी त्याचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला नलावडे पाटील होत्या. सूत्रसंचालन बी.एन.खरात यांनी केले. तसेच सर्वांचे स्वागत व आभार मानले.

