आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आमदार सुमित वानखेडे यावेळी पंचायत समितीच्या सभागृहात अधिकाऱ्यांना उद्देशून स्पष्ट संदेश दिला की, योजनांची अंमलबजावणी वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. “गावांचा विकास म्हणजे केवळ रस्ते व इमारती नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, महिला-बालकांचे पोषण, शाश्वत पाणी व्यवस्थापन आणि रोजगार निर्मिती यासारख्या मूलभूत गरजांमध्ये बदल घडवणे हे खरी प्रगती आहे,”कार्यशाळेत अभियानाचे उद्दिष्ट, घटक व कालावधी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुपले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर मख, नायब तहसीलदार माया चावरी , पंचायत समिती उपसभापती किशोर गव्हाळकर, राहुल चोपडा, संतोष तिवारी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
