अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद; प्रचंड मताधिक्याने विजयाचे स्पष्ट चित्र.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली :-*
काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क, विकासदृष्टी आणि सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास ठेवून एटापल्ली तालुक्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाची लाट उसळली आहे.
एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली परिसरात एका महत्त्वपूर्ण उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजयभाऊंच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये जंगी प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा पाया अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
*पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये —*
सुरेंद्र वैरागडे, तुषार वैरागडे,सत्यवान रांपजी,गणेश मडावी,गुरूदास ईष्टाम,विठ्ठल ईष्टाम,अमर वैरागडे, दीपक वैरागडे,लोमेश्वर नैताम, प्रदीप गवारे, पुंडलीक बुरे,राजेंद्र वैरागडे, अंकुश कुडयेटी,सागर कुडयेटी, आदिल कुडयेटी,आशिष कुडयेटी, सुरेश कुडयेटी,अजय नरोटी,आशिष नरोटी,आशिष गावडे,रुपेश गावडे, दिनेश वेलदी,शुभम पेनूरवार, शिवाजी मट्टमी,अंगणथ पुंगारी,महेश कादो,संतोष कोदो,शुभम,मनोहर, सुधाकर,राकेश भांडेकर,प्रज्वल नोगरकर,बंटी,राजेंद्र भांडेकर, अनुराग कोठारे,उमेश,जितेंद्र,अंकित पेंदाम,दीपक पेदा,दीपक ईष्टमी, कार्तिक,अशोक, किरण, चेतन वैरागडे,सन्याशी रापंजी,बळवंत तलांडे, अरुण भांडेकर, आकाश भांडेकर,सुरज वैरागडे,संतोष कांदे, महेश कांदे यांच्यासह मोठा कार्यकर्तावर्ग सहभागी झाला.
*काँग्रेसची मोर्चेबांधणी अधिक गतिमान…*
*गडचिरोली–अहेरी मतदारसंघात अजयभाऊंचा* प्रभाव,जनसंपर्क आणि सर्वसमावेशकता लक्षात घेता पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.गावागावातून,पाड्यापाड्यांतून विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याने या निवडणुकांत गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसकडे सत्ता परिवर्तनाची मजबूत संधी निर्माण होत आहे.ही पक्षप्रवेश लाट ही केवळ राजकीय हालचाल नसून,जनतेचा विश्वास, विकासाची अपेक्षा आणि अजयभाऊं वरील भावनिक निष्ठा याचे प्रतीक आहे.
*उत्साहपूर्ण स्वागत…*
नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः पुढे येऊन दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत केले.पक्षाच्या घरात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी आपुलकीने सामावून घेतले.
*कार्यक्रमाला अतुलनीय प्रतिसाद…*
या प्रसंगी रमेश वैरागडे,सुधाकर गोटा,सुनील मडावी,प्रज्वल नागूलवार,स्वप्नील नैताम,सुनीता संदीप वैरागडे,छायाताई हिचामी, बेबीताई हेदो,नरेश रापांजी,धरती वैरागडे, जितेंद्र लटारे,प्रशांत गोटा,अजुभय्या पठाण,सदाशिवजी कुळयेटी,धर्मा मठमी,संदीप वैरागडे, मिलिंद भांडेकर,दिनेश नरोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
*राजकीय, सामाजिक व भावनिक ऊर्जा असलेला हा पक्षप्रवेश…*
एटापल्ली–अहेरी परिसरात हे दृश्य होते –विश्वासाचा जयजयकार,नेतृत्वावर श्रद्धा,विकासाची नवी आशा,आणि काँग्रेसच्या ध्वजाखाली एकजूट होत असलेला जनसमुदाय.
या पक्षप्रवेश सोहळ्याने हे अधोरेखित केले की —अजयभाऊ कंकडालवार यांच्यावरील जनतेचा विश्वास प्रचंड असून आगामी निवडणुकीत प्रचंड मताधिक्याचा विक्रमी विजय त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

