मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* अहेरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे माजी राज्यमंत्री *राजे अम्ब्रिशराव महाराज* यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. दुर्गम व आदिवासी भागात विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.
त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले. गावोगावी संपर्क रस्त्यांचे जाळे उभे राहिले, आरोग्य सुविधा बळकट झाल्या, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण झाल्या. प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या काळात मंजूर झालेली कामे आजही सुरु आहेत. बेली ब्रिज असो, दुरसंचार टाॅवर असो अभिनव आणि लोकाभिमुख विकास करण्याचे व्हिजन असणारे खरेखुरे विकासपुरुष आणि समाजमनावर सुध्दा राज्य करणारा दिलदार राजा म्हणजेच राजे अम्बिशराव महाराज !!
आजही *राजे अम्ब्रिशराव महाराज* हे जनतेच्या मनातील आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे अहेरी मतदारसंघाची ओळख राज्यपातळीवर निर्माण झाली आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली असून, अहेरीच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे विकासपुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
