मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- जिल्हातील सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला आहे. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे सोमवारी दि.17 दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून वाळू नामदेव खेताडे यांच्या सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहे, तर मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.
भगवान खेताडे गाढवमळी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज कोसळल्याने सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्या चारण्यासाठी गेलेला भगवान याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत सहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने खेताडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

