विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर : नेवासा तालुक्यामध्ये गेल्या १५- २० दिवसापासुन दररोज पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून, यामुळे सोयाबीन, कपाशी, चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसून रविवार व सोमवारी रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी- नाले गच्च तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून, अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक रस्तेही पाण्याखाली गेली आहेत.
घोडेगाव- कुकाणा, कुकाणा- देडगाव, घोडेगाव- चांदा, करजगाव- शिरेगाव-चांदा, करजगाव- लांडेवाडी-सोनई, करजगाव-गणेशवाडी-सोनई, या रस्त्यावरील ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहतुकीचा प्रश्नमोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. तसेच तालुक्यात इतरही ठिकाणी अनेक ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेले आहे.
जोमात आलेले पीक, शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास या अतिवृष्टी पावसाने हिरावून घेतला आहे. तरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. रात्रभर सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची ऊस, सोयाबीन, कापूस, जनावरांचा चारापिके व इतर पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनाम्याच्या मागे न लागता सरकसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहिर करावा. या नुकसानीची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे.
रोजच्या पावसाने सर्वच लोक मेटाकुटीला आले असून नद्या,ओढे नाल्यानाही मोठा पूर आल्याने शाळकरी मुलांसह ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे. जनावरांचे चारा पाण्याचे हाल होत आहेत. सध्या पंचनामे सुरू असले तरी ते होणार कधी आणि मदत मिळणार कधी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ऐन दिवाळीच्या सणाला पावसाने होत्याचे नव्हते केल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे व मोठ्या चिंतेत शेतकरी वर्ग आहे.
नेवासा तालुक्यामध्ये परतीच्या पाऊसाने काढणीस आलेले सोयाबीन व वेचनीला आलेला कापूस तसेच इतर पिकंचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहिर करावा. शेतकऱ्यांना नुसकान भरपाई त्वरीत द्यावी.
जयवंत मोटे शेतकरी, वडाळा बहिरोबा
शिरेगाव -खरवंडी रस्त्यावर शिरेगाव येथील रमेश वामन तुवर व पत्नी दमयंती हे शेतकरी दाम्पत्य एक बैली छकड्याच्या सहाय्याने नेहमीप्रमाणे शेतातून चारा घेऊन येत होते.ओढ्याच्या पुलावरून वाहत्या पाण्यामुळे व पाण्याच्या वेगामुळे बैलगाडी पाण्यात वाहू लागली. यावेळी किरण गांगवे या तरूनाने मोठ्या धाडसाने पाण्यात जाधव या शेतकरी दाम्पत्यासह बैलाचे प्राण वाचविले. त्याचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348