मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील कोलपल्ली वन्यप्राण्यांकडुन होणारे मानवी हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात वन्यजीवन व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. देवलमरी जवळील कोलपल्ली परिसरातील दोघांवर बिबट्या हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. देवलमरी जवळ असलेल्या कोलपल्ली येथील मयनाबाई शामराव सडमेक वय ४५ वर्ष ही शेतात काम करताना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्यात महिला व बाळ गंभीर जखमी झाले आहेत. ही नेहमी प्रमाणे शेतात गेले होती कामं करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी तिच्यावर प्राण घातक हल्ला केला.
शासन व प्रसाशन लक्ष देऊन बिबटयाचा तात्काळ बंदोबस्त करावा. आणि सदर महिलेला नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348