✒️उमेश इंगळे अकोला प्रतिनिधी
अकोला:- महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रूपचंद नगर प्रभाग क्रमांक 18 येथील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात नरक यातना भोगत आहेत. सर्वीकडे घ्राणीच साम्राज्य पसरले असल्यामुळे महानगर पालिका प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
रूपचंद नगर हे अकोला महानगर पालिका मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांना अशी आशा होती की, आपल्या परिसर स्वच्छ आणि सुंदर होईल पण आज रुपचंद नगर येथील स्थानिक रहिवाशांच्या घरामागून नाल्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे त्यामुळे या नाल्यातील घाण सांडपाणी नागरिकांच्या घराच्या आवारात तसेच वाहतूक करणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत आहे. या सांडपाण्यामुळे येथील शाळकरी मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या अत्यंत घाण सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचे शाळकरी मुला मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक रहिवासी यांना रूपचंद नगर हा ग्रामीण भाग अकोली ग्रामीण भागात येत होता त्यावेळेस या परिसराची नित्यनेमाने साफसफाई होत होती. परंतु रूपचंद नगर परिसर जेव्हापासून अकोला महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाला आहे, तेव्हापासून रूपचंद नगरात कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत. विद्युत पोलवर लाईट नाहीत. रूपचंद नगराच्या मुख्य प्रवेश दराजवळ खूप मोठ्या प्रमाणात या नाल्यातील सांडपाणी येथे जमा होते. त्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे आज स्थानिक रूपचंद नगर रहिवासी यांनी महानगरपालिका उपायुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग येथे निवेदन देऊन सदर नाल्याचे काम त्वरित करण्यात यावे ही मागणी केली. अन्यथा रूपचंद नगर वाशी महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेणार आहेत असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळेस सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, अरुण गवई, जगतपाल जाधव, संजय तेलगोटे, प्रवीण सांगळे, वामनराव खंडारे, दत्तात्रय सांगळे, संतोष शिरसाट, तेजराव इंगळे, मनीष दाभाडे, मुन्ना श्रीवास, संतोष दुबे आदी प्रभाग क्रमांक 18 मधील रूपचंदनगरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348