अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
सावनेर:- महसूल विभाग सावनेर अंतर्गत येणाऱ्या जलालखेडा (पंढरी) येथील सुधाकर गाेंडुळे यांची शेती साझा क्र.३६ अंतर्गत ०.५१ हेक्टर असून शेतीला लागून नाला वाहत असल्याने यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला फार मोठा पूर आला असून शेतातील संपूर्ण कपाशीचे पीक खरडून नेले यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याने गाेंडुळे यांची शेती पडीत झाली आहे.तलाठी यांनी चुकीच्या सर्वे केला असून पीक नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले आहे.
सावनेर तालुक्यातील अनेक गावातील काही शेतकऱ्यांचे काहीही नुकसान झाले नसताना सर्वे मध्ये नुकसान झाल्याचे दाखवून नुकसान भरपाई चा लाभ देण्यात आला. या चुकीच्या सर्वे बाबत तहसीलदार सावनेर यांना लेखी निवेदन दिले असून अजून पर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही.संबंधित विभागाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी सुधाकर गाेंडुळे यांनी निवेदनातून केली आहे.