महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- महाराष्ट्राचा अनमोल वारसा असलेले गड किल्ले आज खंडर होण्याच्या मार्गावर आहे. हे किल्ले महाराष्ट्राच्या बलिदानाची साक्ष आहे. ते चांगल्या स्थितीत असतील तर आपला इतिहास अजुन हजारो वर्ष जिवंत राहील. पण सरकार कुठलेही असो नेहमी सरकारने या गड किल्ले यांचा कडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आज खंडर होत चालली आहे.
यामुळे संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे खऱ्या अर्थाने जिवंत स्मारक आहेत. हे जीवित ठेवायचे असेल तर गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे आहे. असे संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या प्रमाणे रायगड किल्ल्याचे संवर्धन, जतन होत आहे. ते रायगड मॉडेल आपण बाकीच्या किल्ल्यांचे का करू शकत नाही? सरकारला काही अडचण असेल तर आमची फोर्ट फेडरेशन ही संस्था स्थापन झाली आहे. त्या माध्यमातून आम्ही गड, किल्ल्यांचे संवर्धन करू. आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको. असे संभाजीराजे छत्रपती भोसले म्हणाले आहे.
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी दि.१७ संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व सहकारी संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे, प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे, व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका डॉ. संज्योत वैद्य, पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे आदी यावेळी उपस्थित होते.