सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010
जालना:- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक विविध समस्या समोर येत आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात जालना जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात वाहनांचे नामांतर करण्यासाठी जी शासनाने ठरवून दिलेली वेळ 10 ते 6 असताना ही काही अधिकारी यांच्या मनमानी करत दोन वाजेपर्यंत कारोबार चालू आहे.
त्यामुळे सपुर्ण जालना जिल्ह्यातीन व ग्रामीण भागातील खेडेगावातील गाड्यांचे नामांतर करण्यासाठी वाहन मालक वर्ग गाडी घेणार गाडी विक्री करणारे लोक हे लाब लाबच्या गावावरून येणाऱ्या नागरिकांचाही विचार करण्यात यावा कार्यालयाच्या बिफोर वेळेनुसार अनेकांना कार्यालयात येऊन सुध्दा परत जावे लागते त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच कार्यालयात ड्रायव्हिंग स्कूल मार्फत पक्क्या लायसन्स चाचण्या ह्या स्कुलच्या गाड्या आँनलाईन फार्म नं 11 असेल त्यांनाच पक्क्या लायसन्स परवानगी देण्यात यावी. निवेदनावर सतिश म्हस्के, शोयेब खान, सज्जु लाला, शेख अलिम, फारुक खान नुमान बागवान, सैय्यद इस्माईल, कलीम तांबोळी यांची नावे आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

