Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

बाबा तुमच्या माघारी….!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
बाबा तुमच्या माघारी….!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखिका/कवयित्री – ज्योती किरतकुडवे (साबळे) मोब. 9930027923

6 डिसेंबर 2022 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन। या दिनाचे औचित्य साधून असंख्य भीमअनुयायी चैत्यभूमी, दादर येथे बाबांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि तिथून परिवर्तन वादी विचारांचा भीम आपल्यासोबत विचारांतून घेऊन जातात, पण ती भीमजागृती एका दिवसासाठी मर्यादित होऊन राहते. दुसरा दिवस उजाडला की, पुन्हा येरे माझ्या मागल्या… अशी स्थिती आज काही भीम अनुयायांची झालेली दिसते, मग मनात कुठेतरी विचार येतो, खरंच आपण डॉ. बाबासाहेब यांचे विचार संपूर्णपणे आत्मसात केले आहेत का? केले असतील तर आजही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही सक्षम का नाही झालो? याचे कारण काय या प्रश्नाचे चिंतन करणे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी हा लिहिलेला लेख,

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून मी एक पत्र लिहित आहे.

आादरणीय बाबांस, विनम्र अभिवादन!

पत्रास कारण की, बाबा तुम्ही अस्पृश्यता संपविण्यासाठी जो संघर्ष केला, जे महान कार्य केले त्या कार्यातूनच तुम्ही दिवसरात्र एक करून भारतीय संविधानाची निर्मिती केलीत, आणि आम्हा स्त्रियांच्या बाजूने सक्षम असा कायदा निर्माण केलात… तुमचे उपकार या जन्मात तरी फिटणे अशक्य, तुमच्या सारखा बुध्दीमान महामानव पुन्हा जन्मास येणे अशक्य, पण तुमच्या विचारांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही काही प्रमाणात अयशस्वी झालो आहोत असे वाटते.

वेळोवेळी तुमच्या कार्याचे वाचन करताना तुमचा तो आजीवन संघर्ष, जातीधर्मांमध्ये आसलेली माणसां माणसांतील मनुवादी विचारांची विभिन्नता, वर्षानुवर्षे अस्पृश्य समाजावर लादलेली गुलामगिरी, ती तुम्ही दूर केलीत. याची जाणीव आम्हाला आहे, पण ती गुलामगिरी पुन्हा डोके वर तर काढणार नाही याची सतत भिती वाटत राहते, मग मनात विचार येतो की, भीमसंघटन मजबूत राहिले आहे काय? बाबा तुमच्या कार्याचा अभ्यास करताना, तुम्ही 1913साली उच्च शिक्षणासाठी केलेले अमेरिकेला प्रयाण, तुम्ही मिळवलेली 1915 मध्ये प्राचीन भारतातील व्यापार या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाची एम.ए. पदवी, 1916 मध्ये पी.एच.डी. पदवी, नंतर 1917 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पोलिटिकल सायन्स संस्थेत केलेला प्रवेश, मग 1918 मध्ये मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तुम्ही केलेले कार्य, नंतर बहुजनांच्या जागृतीसाठी 1920 मध्ये तुम्ही मूकनायक पाक्षिकाची सुरूवात केलीत, त्याच दरम्यान 31 जानेवारी 1920 ला पुन्हा लंडनला प्रयाण करून तुम्ही 1921 मध्ये एम. एससी. (अर्थशास्त्र) मध्ये मिळवलेली पदवी त्यानंतर 1922 मध्ये तुम्ही बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊन 1924 ला डी. एस.सी. (अर्थशास्त्र) ही पदवी मिळवली. त्यातच तुम्ही बहुजनांच्या हितासाठी 1924 मध्येच बहिष्कृत हितकारिणी सभा सुरु करून त्यानंतर त्याकाळी माणूस असूनही पिण्याच्या पाण्याचा हक्क जेव्हा अस्पृश्यांना नाकारला गेला होता तेव्हा तुम्ही 20 मार्च 1927 महाड चवदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलात. त्यांनतर 3 एप्रिल 1927 ला बहिष्कृत भारत या पाक्षिकाची सुरुवात करून तुम्ही 25 डिसेंबर 1927 ला जी मनुस्मृती माणसाला माणूस असूनही हीन वागणूक देत होत होती अशा मनुस्मृतीला जाळून अस्पृश्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दाखवली.त्यानंतर 1930 मध्ये समानतेच्या हक्कासाठी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशसाठी केलेला सत्याग्रह, 1930 मध्ये जनता पाक्षिकाची सुरूवात करून, 1932 मध्ये स्त्रियांच्या, अस्पृश्यांच्या हितासाठी लिहिलेला पुणे करार, 16 fिडसेंबर 1934 मध्ये चरी तालुका, अलिबाग येथील शेतकऱयांच्या आंदोलनासाठी केलेला सत्याग्रह, 13 ऑक्टोंबर 1935 रोजी येवले येथे केलेली धर्मांतराची घोषणा, 1936 मध्ये कामगारांच्या हितासाठी केलेली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, 20 जुलै 1942 साली शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा ब्हुजनांना नागपूरच्या सभेत दिलेला संदेश, नंतर 1942 ला व्हॉईसरायच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री म्हणून तुमची झालेली निवड आजच्या सर्व स्तरातील कामगारांसाठी हिताची ठरली आहे, कारण तुम्ही कामगारांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना नोकऱया देणे, बडतर्फ करणे, कारखान्यांत बढती देणे, कामाच्या तासांची कमाल मर्यादा व वेतन श्रेणी, भरपगारी रजा देणे, कामगारांना स्वत नि आरोग्यदायक वसतीस्थानाची तरतूद करणे वगैरे बाबतीत कायदे बनविले व नंतर ते अंमलात सुध्दा आणून दाखवले. तुम्ही 8 जुलै 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलीत, 20 जून 1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केलीत, 1947 ला स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात आपण कायदेमंत्री झालात, 26 नोव्हेंबर 1949 ला लोकशाही असलेले बलाढ्य असे संविधान निर्माण करून आपण या भारत देशात कधीही न होऊ शकलेली अशी समता, बंधुत्व, स्वातंत्र्य असलेली न्यायव्यवस्था प्रणाली संविधानाच्या रुपाने भारतात प्रस्थापित केलीत.इतकेच नाही तर तुमच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तुम्ही 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्या अनुयायांसोबत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व करूणेची शिकवण देणा-या अशा महान बौध्द धम्माची दीक्षा घेऊन, भारतात पुन्हा एकदा विसाव्या शतकात बौध्द धम्म पुनर्जिवित केलात.

आपण जगातील एकमेव असे महान क्रांतीकारी नेते आहात की, तुम्ही रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती आपल्या अथांग ज्ञानाने घडवून आणलीत, पण आज आम्ही, भीमअनुयायी म्हणून स्वतला म्हणवून घेत असताना आम्ही हा आपला समतावादी क्रांतीकारी विचारांचा लढा टिकवण्यात असमर्थ ठरतो आहोत काय? याची वेळोवळी प्रचिती तेव्हा येते जेव्हा हा बहुजन समाज एकत्र येत नाही किंवा शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या क्रांतीचा नारा आम्हाला नीट समजून घेताच आला नाही. आज आपण दिलेल्या शैक्षणिक स्वातंत्र्यामुळे बरेचजण शिकलेत, संघर्ष ही करत आहेत, पण हा संघर्ष संघटीतपणे नाही तर आपआपसात होतो आहे. काही अनुयायी स्वार्थासाठी असंघटीत झालेले दिसतात. आंबेडकर चळवळीची धार कुठेतरी बोथट होत आहे असे चित्र पहावयास मिळाले की, तेव्हा पुन्हा असे वाटते, आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले आहेत काय? त्यांचा समतेचा संघर्ष आम्ही नीट समजून घेतला आहे काय? फक्त भाषणातून बाबासाहेबांचे विचार मांडणे म्हणजे संघटना चालविणे आहे काय? मग तुमचे अमूल्य विचार आत्मसात करून आम्ही संघटीत होऊन संघर्ष कधी करणार? याचा चिंतनशील विचार होणे काळाची गरज झाली आहे.

बाबा तुम्ही सांगितले आहे, ’शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तक्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो कोणी पिईल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने क्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्वॅढत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तक्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तक्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱयांनी ध्यानी घ्यावे. त्यासाठी तुम्ही पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करुन,मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्टःहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे आपण मानत होतात ते अगदी खरे आहे, पण हल्लीच्या शाळा विद्यार्थ्यांना घडविण्यापेक्षा पैसा छापण्याचे कारखाने झाले आहेत. असे वाटते. मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनण्यासाठी शासन लक्ष देत आहे का? राष्ट्रहित, समाजहित जपण्यासाठी मुलांवर योग्य असे संस्कार घडविले जात आहेत का? आणि पालकही त्या दृष्टीने मुलांकडे लक्ष देत आहेत का?, असे प्रश्न माझ्या मनात सतत निर्माण होतात, कारण कर्तव्यदक्ष, सुसंस्कृत नागरिक घडत नसल्याने आज देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुलांवर योग्य संस्कार होत नसल्याने कुठेतरी माणुसकीचा जीव घेतला जात आहे, असे चित्र वारंवार पहावयास, ऐकावयास मिळते. तेव्हा दुःख होतं आणि बाबा तुमची आठवण येते. आजीवन माणुसकीसाठी, समतेसाठी तुम्ही केलेला संघर्ष आठवतो. प्रज्ञा, शिल, करूणा याची जाणीव मुलांमध्ये करून देण्यासाठी, ही बीजे त्यांच्या अंतर्मनात लहानपणापासून आम्ही पालक म्हणून रुजवत आहोत का? याचा विचारही तेव्हा करावासा वाटमहिलांच्या बाजूने सक्षम कायदा असताना देखील राजेरोसपणे महिलांवर अत्याचार घडत आहेत, कायदा कठोर असताना देखील अपराध्याला लवकरात लवकर शासन होत नाही या सर्व घटना जेव्हा प्रत्यक्षपणे डोळ्यासमोरून जातात तेव्हा असं वाटतं, संविधानाची अंमलबजावणी योग्य होत आहे का? आणि योग्य होत नाही हे लक्षात येऊनही आम्ही सर्व बहुजन एकत्र येऊन यासाठी संघटीतपणे संघर्ष करणार आहोत का? असे असंख्य प्रश्न आणि त्यावर विचार करणे, हाच ध्यास मनात ठेवून, बाबा तुमच्या माघारी, तुमच्या या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी या सर्व गोष्टींवर विचारमंथन करून त्यावर संघटीतपणे कार्य करणे आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सतत संघर्ष करत राहणे ही तुम्हाला खरी आदरांजली ठरेल. बाबा तुम्हाला विनम्र अभिवादन!

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

कविता: पावन चैत्यभूमी

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कविता: पावन चैत्यभूमी

कविता: पावन चैत्यभूमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In