✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात राज्यात चांगलच वातावरण तापलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा कडून पण आज आंदोलने करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (9 डिसेंबर) पैठणमध्ये केलं होतं. त्यावरुन राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ पाटील यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी महाराष्ट्र संदेश न्युजला माहिती दिली की, आम्ही आज मुंबईतील सर्व जिल्हा अक्ष्यक्षासह कार्यकर्ते यांची मीटिंग घेऊन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या वर कारवाई करण्यात यावी याबदल मागणी करण्यात येणार आहे. ते यावेळी म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मंडळातून हकलप्पटी करण्यात यावी अशी मागणी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी केली.
काय आहे प्रकरण…
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. एकीकडे राज्यात महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

