किष्टापुर दौड, तोडसा, बेज्जूरपल्ली आणि मादारम येते भाजपाचे सरपंच आणि सदस्यांचा दणदणीत विजय.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली जिल्हाचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लडविलेल्या 7 पैकी 4 ग्राम पंचायतीत भाजपा पैनलचा दणदणीत विजय झाला आहे, ह्या सर्व ग्रामपंचायतीत अम्ब्रिशराव आत्राम यांनी झंझावाती प्रचार दौरा केला होता.
अहेरी तालुक्यातील किष्टापुर दौड येते सरपंच पदी अमृता तोरेम सह 4 सदस्य, एटापल्ली तालुक्या तील तोडसा येते सरपंच पदी वनिता कोरामी सह 5 सदस्य तसेच सिरोंचा तालुक्यातील बेज्जूपल्ली येते सरपंच पदी इप्पो मडे सह 3 सदस्य आणि मादारम ह्या ठिकाणी 9 पैकी 6 सदस्य भाजपाचे निवडून आल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील ह्या 4 ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टी पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे, राजमहाल अहेरी येते सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे राजे साहेबांनी पुष्पहार घालून त्यांना मिठाई देत सर्वांचे अभिनंदन केले, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348