तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील सासती शिवारातील मोठ्या प्रमाणात वेकोली विभागाने जमिनी अधिग्रहण केल्या. पण सासती या गावातील काही नागरिकाच्या जमिनी वेकोलि विभागाने अधिग्रहण केल्या नाही. त्यामुळे ज्या नागरिकांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहण केल्या नाही अशा नागरिकांत शासना विरुध्द संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या परिसरातील नागरिकाच्या जन भावना लक्षात घेऊन अधिग्रहण मधून सुटलेल्या जमिनींच्या सनदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांचेसोबत या विषयावर मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंग नुसार मिळालेल्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 28 डिसेंबर ला या जमिनींचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार गाडे, आर आय, तलाठी आणि कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकरी यांचे उपस्थितीत आज एड. अभियंता प्रशांत घरोटे, प्रशांत साळवे, पुरुषोत्तम हींगाणे यांचे तथा अन्य शेतकऱ्यांचे उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला.

