युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- येथील हिवाळी अंतिम टप्प्यात आले आहे. पण या नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या वाट्याला काय आले याचा सर्व नागरिकांनी शोध द्यावा लागणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भाला काहीच मिळालं नसेल तर हे अधिवेशन मौज मजेच पिकनिक बनवण्याच अधिवेशन ठरणार यात तिर मात्र शंका नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मितकरी यांनी सत्ता पक्षावर घणाघात प्रहार केला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांना थर्टीफस्ट साजरे करण्याची घाई झालेली आहे. दोन आठवड्यापासून शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात साधी चर्चा झालेली नाही आणि अधिवेशन अंतिम टप्प्यात आले.
विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केले.
आमचा आरोप आहे की शेतकर्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आग्रही नाही. हरितक्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईकांनी विविध योजना राबविल्या होत्या. हा भाग सुजलाम सूफलाम व्हावा ही नाईकांची अपेक्षा होती. परंतु नागपूर अजूनही मागास आहे. अशात नागपुरात अधिवेशन होते आणि त्यात विदर्भावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकार उद्या पॅकेज घोषणा करणार.
मात्र हे सरकार केवळ घोषणा करते अंमलबजावणी करीत नाही. देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. तूम्ही सत्तेत आल्यावर मुंबईचे का होता. एका वेळी तूम्ही भिष्म प्रतिज्ञा केली होती की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. ते मात्र विदर्भाकडेच दूर्लक्ष करीत आहे. विदर्भामुळे हे राज्य पोसले जाते. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवावा.