सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- राज्यातील पालकांना काळजीत टाकणारी खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षा बाबत मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यात मार्च महिन्यामध्ये राज्यातील 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 610 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यात मुली गायब होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.
राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातून मार्च महिन्यात 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज 70 मुली गायब झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींचं वय 18 ते 25 वयोगटातील आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील 5 हजार 610 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचं बेपत्ता होण्याची कारणं लग्न, नोकरी, प्रेमाचं आमिष अशी सांगितली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झालेल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेम प्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
अहवाल सरकारला पाठवला – रुपाली चाकणकर
मागील 16 महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनला मीसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? किंवा त्यांचं काम कसं चालतं, हे पाहाणं गृह विभागाचं काम आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. गृह विभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

