प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नागरिकांनसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने 2000 रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, 30 सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. अशी माहिती समोर आल्याने 2000 रुपयाच्या नोटांची साठवणूक करणाऱ्याचे चांगलेच धागे दंकावले आहे.
केंद्र सरकारने 2016 मध्ये एक रात्री नोट बंदी जाहीर करून देशातील नागरिकांना अवचित केले होते. या नोटबंदी नंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता 2000 च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.
एकावेळी केवळ 20 हजाराच्या नोटा बदलणार..
आरबीआयने सांगितले की, 23 मे पासून एकावेळी केवळ 20 हजार रूपयांच्याच 2000 हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडणार आहे. आरबीआय ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, 2018-2019 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
2000 नोटा व्यवहारातून गायब…
मागील अनेक दिवसापासून 2000 रूपये चलनाच्या नोटा व्यवहारातून गायब झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या नोटाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ब्लॅकमनी निर्माण झाले आहे. त्यामुळे आता अशा लोकांचे घबाड मोठ्या प्रमाणात बाहेर येनाची शक्यता निर्माण झाली आहे.