राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महानगर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील विरारमध्ये इमारतीचे बांधकाम चालू असताना भिंत कोसळली आणि भीषण घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला मजूरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारी 3.30 तीन वाजताच्या सुमारास घडली आहे.
विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरार पूर्वेच्या स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला सुरू असणाऱ्या इमारतीजवळ घडली आहे. फायलिंगपासून चौदा फुट उंच भिंतीच काम सुरु होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली आणि तिथे काम करणारे पाच मजूर त्या भिंतीखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाहूबाई अशोक सुळे वय 45 वर्ष, लक्ष्मीबाई बालाजी गावाने वय 45 वर्ष, राधाबाई एकनाथ नावघरे वय 40 वर्ष असे मयत झालेल्या महिला कामगारांची नाव आहेत. तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे वय 32 वर्ष आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. काही जण तातडीने बाहेर निघाल्यामुळे ते वाचले आहेत.
बिल्डराने सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना आखलेल्या नव्हत्या. भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे. मृत सर्व मजूर हे नाका कामगार आहेत. हे सर्वजण मराठवाडा नांदेड, परभणी येथील रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करीत होते.

